शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 1:36 PM

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, हा नवा भारत आहे. यात आडनावाला महत्व नाही तर आपलं नाव बनविण्याची क्षमता ठेवणार तरूण क्षमता ठेवतात. भारतात अनेक गोष्टी बदलत आहेत. यात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. लोकांमध्ये आणि प्रशासनात संवाद असणे गरजेचे आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.

मनोरमाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहमती घेण्याची आवश्यकता नाही पण सार्वजनिक जीवनात वावरताना विविध विचारधारांच्या माणसांचे ऐकले पाहिजे. आम्ही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून सुरु होणारी अर्थव्यवस्था नव्या भारताच्या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती. त्यांना अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरूणांचे यश मोठं शहर, मोठी संस्थाने अथवा मोठ्या परिवारातून आला असेल यावर निर्भर होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. तरूणांसाठी विविध दारे उघडली आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच भारत सध्या अशा क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे ज्याठिकाणी आम्हाला याआधी पोहचणं कठीण जात होते. स्टार्टअप असो वा क्रीडा. लहान लहान शहरातील युवाही जे कोणत्याही वशिल्याशिवाय पुढे जात आहे. ज्यांच्याकडे स्वप्न आहेत त्यांना उडण्याचे बळ मिळत आहेत. ते त्यांच्या कतृत्वावर यशाचं शिखर गाठत आहे. भारताचं नाव उंचावत आहेत. हे नवीन भारताचं यश आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

भारत हा एकमेव देश आहे ज्याठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात. मग आपण या भाषांचा उपयोग करत एकता आणण्याचं काम करू शकत नाही का? वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम मीडिया करू शकत नाही का? हे कठीण नाही जितकं दाखविले जाते. आज लोक म्हणतात की, आम्ही स्वच्छ भारत बनविणार, आम्ही भारताला भ्रष्टाचारमुक्त बनविणार, आम्ही सुशासन आणणार, हे सगळं शक्य झालं कारण यासाठी इच्छाशक्ती हवी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी