शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ना बंदूक, ना युद्द....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:47 IST

भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान आखला आहे

नवी दिल्ली, दि. 19 - सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे असून, कोणीही माघार घेण्यास तयार नाही. चीन वारंवार युद्धाची धमकी देत असताना, भारत सरकारने मात्र चीनला धडा शिकवण्यासाठी मास्टरप्लान आखला आहे. चीनची आर्थिक कोंडी करत मोठी जखम देण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. 

चीनला आर्थिक बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. वीज, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुरवठ्यासाठी संबंधित नियम अजून कडक करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. यामुळे चीनी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणं कठीण होईल. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (CEA) देशातील पॉवर स्टेशन्स आणि स्मार्ट ग्रिड सिस्टम्सला सायबर हल्ल्यांपासून रोखण्यासाठी ज्या प्रकारचा रोडमॅप तयार करत आहे, त्यामुळे चिनी कंपन्यांना यामध्ये प्रवेश करणं कठीण होणार आहे. 

त्याचप्रमाणे टेलिकॉम सेक्टरमध्येही सुरक्षेचे नियम अजून कठीण केले जाण्याची शक्यता आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सध्या चिनी कंपन्यांचा दबदबा आहे. गेल्याच आठवड्यात स्मार्टफोन तयार करणा-या 21 कंपन्यांना डाटाचोरीच्या संशयाखाली नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये चिनी कंपन्यांची संख्या जास्त आहे. शाओमी, लिनोव्हो, ओप्पो, विवो आणि जिओनी यांचा बाजारात दबदबा असून, अर्ध्याहून जास्त मार्केटवर त्यांचा प्रभाव आहे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती आणि वितरणासाठी चिनी साहित्याचा वापर केला जातो. ट्रान्समिशन लाईन पसरवण्यासाठी बोली लावणा-या कंपन्यांमध्ये सीएलपी इंडिया प्रायवेट लि. सोबत चिनी कंपनीही सामील असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं होतं. पॉवर ट्रान्समिशनमधील नव्या नियमांमुळे स्थानिक कंपन्यांना मदत मिळणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी चीनी साहित्यांसाठी अनेक नियम लागू केला असून, त्यांची तपासणी करायचं ठवलं आहे. 

दरम्यान डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात जपान भारताच्या बाजूने उभा राहिला असल्याने चीनचा संताप झाला आहे. जपानने भारताला पाठिंबा दिला असल्याने चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 'जरी जपानला भारताला समर्थन द्यावेसे वाटत असले, तरी त्यांनी भारत - चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर भाष्य करण्याची गरज नाही', असं चीनकडून सांगण्यात आलं आहे. जपानने भारताला पाठिंबा देताना कुठल्याही देशाने जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने डोकलाममधील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामIndiaभारत