शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

१ जुलैला लागू होणार नवे कायदे; काही कलमे काढली, काही वाढवली, IPC-CrPC मध्ये नेमके काय बदलले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 5:20 PM

IPC-CrPC Law New Amendment: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलेले नवे कायदे आता लागू केले जाणार आहेत.

IPC-CrPC Law New Amendment: केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांमध्ये काही बदल केले. या कायद्यांमध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे एक जुलैपासून लागू केली जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची जागा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत हे नवीन कायदे, तरतुदी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केली. आता एक जुलैपासून हे कायदे लागू करण्यात येणार आहेत. हे तीन कायदे भारतीय पुरावा कायदा १८७२, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ आणि IPC यांची जागा घेतील. तज्ज्ञांच्या मते, तीन नवीन कायद्यांमुळे दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा अधिक कडक होणार आहे.

भारतीय न्याय संहितेत २० नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. तर आयपीसीमधील १९ तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच ३३ गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली आहे. तर 83 तरतुदींमध्ये दंडाच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे, याशिवाय २३ गुन्ह्यांमध्ये अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, ६ गुन्ह्यांमध्ये 'सामुदायिक सेवा' या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्या कायद्यांत नेमका काय बदल झाला?

- IPC: कोणते कृत्य गुन्हा आहे आणि त्यासाठी कोणती शिक्षा होईल? हे या अंतर्गत ठरवले जाते. आता हा कायदा भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखला जाईल. आयपीसीमध्ये ५११ कलमे होती, तर नवीन भारतीय न्याय संहितेत ३५८ कलमे असतील. यामध्ये २१ नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. ४१ गुन्ह्यांमध्ये कारावासाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ८२ गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. २५ गुन्ह्यांत किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर ६ गुन्ह्यांमध्ये समाजसेवेची शिक्षा होणार आहे. तर अनेक कलमे रद्द करण्यात आली आहेत.

- CrPC: अटक, तपास आणि खटला चालवण्याची प्रक्रिया सीआरपीसीनुसार होते. CrPC मध्ये ४८४ कलमे होती. आता भारतीय नागरिक संरक्षण संहितेत ५३१ कलमे असतील. १७७ कलमे बदलण्यात आली आहेत. ९ नव्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

- IEA: खटल्यातील तथ्य कसे सिद्ध होईल, जबाब, साक्ष कसे नोंदवले जातील, हे सर्व भारतीय पुरावा कायद्यानुसार निश्चित केले जाते. भारतीय पुरावा कायद्यात १६७ कलमे होती. आता यांमध्ये १७० कलमे असतील. २४ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ कलमे रद्द करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहHome Ministryगृह मंत्रालयCentral Governmentकेंद्र सरकार