शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

I.N.D.I.A. आघाडीमध्ये पंतप्रधानपदावरून जोरदार रस्सीखेच, शर्यतीत कोण पुढे, मिळताहेत असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:25 IST

INDIA Alliance: विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचं नाव पुढे केलं जात आहे. तर जेडीयूकडून नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. त्याशिवाय इतर पक्षही आपापल्या नेत्यांच्या नावांची दावेदारी करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केलं आहे. तर समाजवादी पक्षाने पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची नावं पंतप्रधानपदासाठी समोर करत अखिलेश यादव यांच्या नावाचीही दावेदारी सांगितली आहे.

दरम्यान, भाजपाने इंडिया आघाडीतील रस्सीखेचीवर टिप्पणी करताना नितीश कुमार हे इंडिया आघाडीमध्ये साईडलाईन झाले आहेत, असा टोला लगावला आहे. भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी सांगितले की, नितीश कुमार यांचं स्वप्न भंगलं आहे. इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे आता एक प्रकारे निश्चित झाले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार यांचे समर्थक पंतप्रधानपदाच्या दावेदारीचं स्वप्न पाहत आहेत. मात्र पंतप्रधानपद दूरच त्यांच्या दावेदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. देशातील काही मोठ्या पत्रकारांनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. मात्र नितीश कुमार यांचं नाव कुठेच नाही आहे.

याशिवाय नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या केलेल्या बिचारा अशा उल्लेखावरूनही सुशील कुमार मोदी यांनी निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना बिचारा बनवलं आहे. चार-चार प्रकरणात शिक्षा झाली आहे. ही शिक्षा कुणामुळे झाली तर ती नितीश कुमार आणि ललन सिंह यांच्यामुळे झाली. आज लालूंच्या आजारपणाचं जर काही कारण असेल तर ते नितीश कुमार आहेत. नितीश कुमार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आम्ही बनावट कागद पत्रांच्या आधारावर लालू यादव यांना फसवलं, असं सांगून माफी मागावी. जर लालू प्रसाद यावद निर्दोष असतील तर त्यांना जाणीवपूर्वक शिक्षा दिली जात आहे.

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी या आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, काँग्रेसकडून राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तर बिहारमधील सत्ताधारी जेडीयूने सांगितले की, नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, असे बिहारच्या जनतेला वाटते. तर अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव हेसुद्धा  स्वत:ला दावेदार मानत आहेत.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालAkhilesh Yadavअखिलेश यादवNitish Kumarनितीश कुमार