शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर; धक्कादायक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:54 IST

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे.

India Student Suicide Report:  भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा आत्महत्येच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे एका नवीन अहवालातून समोर आले आहे. या अहवालातून महाराष्ट्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार हे संकट सतत वाढत असल्याचे समोर आलं आहे. दरवर्षी आत्महत्येचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढत असू आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ होत आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटावर आधारित वार्षिक आयसी ३ कॉन्फरन्स आणि एक्स्पो २०२४ मध्ये बुधवारी "विद्यार्थी आत्महत्या: भारतात वाढणारी महामारी" हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे, तर विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. "गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट, चार टक्क्यांनी चिंताजनक वार्षिक दराने वाढले आहे," असे आयसी ३ संस्थेच्या संलग्न अहवालात म्हटले आहे.

सन २०२२ मध्ये एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी ५३ टक्के आत्महत्या मुलांनी केल्या होत्या. २०२१ ते २०२२ दरम्यान, मुलांच्या आत्महत्या सहा टक्क्यांनी कमी झाल्या, तर मुलींच्या आत्महत्या सात टक्क्यांनी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येचा कल या दोन्हीपेक्षा जास्त आहे. गेल्या दशकात, ०-२४ वयोगटातील लोकसंख्या ५८२ कोटींवरून ५८१ कोटींवर घसरली, तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरून १३,०४ वर गेली आहे.

महाराष्ट्रासाठी धक्कादायक आकडेवारी

आयसी थ्री इंस्टीट्यूटच्या विद्यार्थी आत्महत्येसंदर्भातील अहवालामध्ये भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आहे. देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येच्या एक तृतीयांश आत्महत्या या तीन राज्यांमध्ये होत असल्याचे अहवालातून समोर आलं आहे. वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. देशातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येपैकी १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रातील विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे ही अतिशय चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय राजस्थान या बाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा शहरातून अनेकदा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत असतात. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी