शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पाकचे पाणी रोखणार; पंजाबमधील 'या' नदीवर भारताकडून धरण बांधण्यास सुरुवात

By देवेश फडके | Updated: January 4, 2021 09:14 IST

पंजाबमधील शाहपूरकंडी गावात बांधण्यात येणारे धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, येथे उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळू शकतो.

ठळक मुद्देभारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखण्यावर काम सुरूपंजाबमधील रावी नदीवर धरण बांधण्याच्या कामाला वेगधरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पातून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा लाभ

चंदीगड :भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नदींच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्याच्या अनेक योजना राबवल्या जात असताना आता पंजाबमधील एका नदीवरधरण उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. पंजाबमधील शाहपूरकंडी गावात बांधण्यात येणारे धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, येथे उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. 

कोरोना संकटातून हळूहळू देश सावरत असताना भारताच्या पंजाबमधून पाकिस्तानात वाहणाऱ्या रावी नदीवर धरण बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सन २०२० पर्यंत हे धरण बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नदीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील सीमेवरील रावी नदीवर धरण बांधण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धरणाचे बांधकाम थांबवले गेले होते. हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 

रावी नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे नाव रणजीत सागर असून, या योजनेवर एकूण खर्च २ हजार ७९३ कोटी रुपये होणार असून, यापैकी ४८५.३८ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. धरण बांधण्याचे मुख्य काम ६० टक्के पूर्ण झाले असून, सन २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. 

२०६ मेगाव्हॅटचा विद्युत प्रकल्प

शाहपूरकंडी धरणावर २०६ मेगाव्हॅटचा विद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये वितरीत केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ८५२.७३ कोटी रुपयांचा प्रतिवर्षी लाभ मिळू शकेल, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकेल. तसेच या धरणाचे पाणी जम्मू-काश्मीरला देण्याबाबतही करार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शाहपूरकंडी भागातील धरणाचा ८० टक्के भाग जम्मू-काश्मीरमध्ये असेल, अशी माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :DamधरणIndiaभारतPakistanपाकिस्तानriverनदीelectricityवीज