शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:16 IST

I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही.

I.N.D.I.A. Seat Sharing Formula: लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली, या आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली असून, लवकरात लवकर यावर निर्णय होणार आहे. जानेवारी महिन्यात बहुतांश राज्यांमध्ये जागा वाटपाचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

जागावाटपाबाबत राज्य पातळीवर चर्चा होणार आहे. बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यात बोलणी होणार आहेत. आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची समितीही स्थापन केली आहे. मात्र, जागावाटप वाटते तितके सोपे काम नाही. अशी पाच ते सहा राज्ये आहेत, जिथे जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे.

दिल्ली-पंजाबदिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये सर्वात मोठा गोंधळ सुरू आहे. काँग्रेस नेतृत्व आणि अरविंद केजरीवाल एकत्र दिसत असले तरी, दोन्ही पक्षांतील राज्य नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. काँग्रेस या दोन्ही राज्यात जागा मागू शकते, तर आम आदमी पार्टी गुजरात, गोवा आणि हरियाणामध्येही काँग्रेसकडे जागा मागू शकते. त्यामुळे या दोन राज्यांबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

उत्तर प्रदेशसर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष काँग्रेससाठी किती जागा सोडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यूपी काँग्रेसच्या काही नेत्यांना इंडिया आघाडीत बसपाचा समावेश करायचा आहे, परंतु समाजवादी पक्षाने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सपासोबत युती करून यूपीमधील 80 पैकी 20 जागांवर काँग्रेसचे लक्ष आहे.

बिहारबिहारमध्ये काँग्रेसची आरजेडी, जेडीयू आणि डाव्या पक्षांसोबत युती आहे. येथील 40 जागांच्या संदर्भात जेडीयू आणि आरजेडी यांच्यातील जागा निवडीबाबत चित्र स्पष्ट नाही. दोन्ही बडे पक्ष प्रत्येकी 15 जागांवर लढतील असे मानले जात आहे. सीपीआय-एमएल आणि सीपीआयने अधिक जागांसाठी दबाव आणला, तर काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागेल.

पश्चिम बंगालबंगालमध्ये डावे पक्ष आणि ममता एकत्र निवडणूक लढवणे अशक्य आहे. अशा स्थितीत डाव्या पक्षांसोबतची युती सुरू ठेवायची की टीएमसीशी हातमिळवणी करायची, हा काँग्रेससमोरचा पेच आहे. दोन्ही पक्षांना काँग्रेसला बंगालमध्ये पाय पसरू द्यायचे नाहीत. अशा स्थितीत बंगालमध्ये काँग्रेसच्या वाट्याला पाच-सात जागांच्या पुढे मिळणे शक्य नाही.

महाराष्ट्रमहाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील, असे वाटत असले तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार माघार घेणार नाहीत. इथले तिन्ही पक्ष 48 जागा समान वाटून घेऊ शकतात.

तामिळनाडूतामिळनाडूमध्ये द्रमुक आणि झारखंडमध्ये जेएमएम यांच्याशी काँग्रेसच्या युतीमध्ये विशेष गुंतागुंत नाही. याशिवाय बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा आहे. अशा सर्व गुंतागूंतीच्या परिस्थितीत नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसAAPआपSamajwadi Partyसमाजवादी पार्टीDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण