शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:21 IST

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळली असून तेथील महागाईसाठी भारत जबाबदार असल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्याने केला आहे. पाकिस्तानातील अर्थ मंत्री हमाद अजहर यांनी देशातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींसाठी भारतासोबतचा व्यापार रद्द झाल्याचे कारण दिले आहे. पाकिस्तानातील टॉमेटोचे दर 400 रुपयांवर पोहोचले आहेत. 

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे. वस्तूंच्या किंमतींनी मोठी झेप घेतली असून भारताने व्यापार रद्द केल्याने असे झाल्याचे अजहर यांनी सांगितले. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. 

पाकिस्तानातील महागाईला हवामानाच्या लहरीपणासोबत त्यांनी दलालांनाही जबाबदार धरले आहे. केंद्र स्वस्त बाजार उभारण्यासाठी प्रांतीय सरकारांसोबत चर्चा करत आहे. महागाईने नागरिक त्रस्त असून जानेवारी-फेब्रुवारीनंतर महागाई कमी होण्यास सुरुवात होईल, असा दावाही अजहर यांनी केला आहे. 

पाकिस्तानला लाखो डॉलरच्या कर्जाची परतफेड चीनकडे करायची आहे. पाकिस्तानमध्ये पुढील 12 महिने महागाई दर 13 टक्के राहणार आहे. यंदाचा हा दर 7.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2018 मध्ये महागाई दर 3.9 टक्के होता. इम्रान खानला अमेरिकेनेही मदत नाकारली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInflationमहागाई