शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 10:11 IST

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत देशभरात ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्तआतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours) 

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."

केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३८ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २७ हजार ३७१ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी १० लाख ५५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४ लाख १२ हजार १५३ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ५० कोटी १० लाख ०९ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात ५ हजार ५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ५ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण ६१ लाख ३० हजार १३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. तर, मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. 

अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ३०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १४ हजार १६६ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. मुंबईत ४ हजार ३४५ रुग्ण सक्रिय असून, रुग्णदुपटीचा कालावधी १ हजार ६३१ दिवसांवर पोहोचला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार