शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

सहा देशांकडून भारताची प्रशंसा....

By admin | Updated: March 15, 2015 00:07 IST

सहा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५

सहा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५

भारताची समर्थ वाटचाल जगासाठी हितावाह
सहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी केली भारताच्या प्रगतीची प्रशंसा
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकामी करण्यात आलेल्या भरकस प्रयत्नांबद्दल सहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी भारताच्या नवीन सरकारची प्रशंसा केली आहे. एक महत्त्वाची भारत शक्ती म्हणून पुढे येणे; जगाच्या दृष्टीने चांगले आहे, असेही अमेरिका, जपान, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या राजूदतांनी आवर्जुन नमूद केले आहे.
दहशतवाद, हवामानातील बदलासह जगापुढील आव्हांनाचा मुकाबला करण्यात भारतची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापार आणि आर्थिक क्षेत्राच्यादृष्टीनेभारतात मुबलक क्षमता आहे, अशा शब्दांत राजदूत आणि उच्चायुक्तांनी भारताच्या प्रगतीची प्रशंसा केली आहे.
अमेरिका आणि भारतादरम्यानची रणनीतिक भागीदारी परिपक्व होत नव्या टप्प्यात पोहोचली आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीने तर अनेक मुद्यांवरील कोंडी फुटली आहे. भारत आणि अमेरिकेने परस्पर सहकार्याने एकत्रित काम केल्यास जागतिक शांतता, लोकशाही आणि आर्थिक समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
मेक इन इंडियासह स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांना चीनमध्ये व्यापक पाठिंबा मिळाला आहे. यासाठी भारतासोबत सक्रिय होत काम करण्याची चीनची इच्छा आहे, असे चीनचे राजदूत लू यूचेंग म्हणाले.
जपानी उद्योगांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत येत्या तीन वर्षात गुंतवणुकीच्या दृष्टीने सवार्ेत्कृष्ठ ठिकाण म्हणून नावारुपास येईल, असे जपानचे राजदूत ताकेशी यागी यांनी सांगितले.
समर्थ आणि सक्रिय भारत प्रत्येकासाठी हितावह आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणूनच नव्हेंतर हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा मुकाबला करण्याकामी भारताला महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, अशा शब्दात ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. बलात्काराच्या घटनांबाबत कोणीही तटस्थ राहू शकत नाही. ब्रिटनही भारताप्रमाणेमहिलाविरोधी अत्याचाराचा लढा देत आहे.
जगापुढील आव्हांनावर मात करण्याकामी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे कॅनडाचे उच्चायुक्त नादीर पटेल म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त पॅट्रीक सक्लींग यांनीही जगाच्या वाटचालीतील भारताचे महत्त्व स्पष्ट केले.