शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:13 IST

तीन वर्षांत टपाल खात्याच्या तोट्यात 150 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली: टपाल खात्यानं तोट्याच्या बाबतीत बीएसएनएल, एअर इंडियाला मागे टाकलं आहे. 2018-19 मध्ये टपाल खात्याचा तोटा 15 हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये टपाल खात्याचा तोटा 150 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे आता भारतीय पोस्ट ही सर्वाधिक तोट्यात असलेली सरकारी कंपनी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य भत्ते यांच्यावर होणाऱ्या खर्चामुळे टपाल खातं तोट्यात असल्याचं सांगितलं जात आहे. वेतन आणि भत्त्यांवर पोस्टाला दरवर्षी आपल्या महसूलापैकी 90 टक्के रक्कम खर्च करावे लागतात. पोस्ट खात्यानंतर बीएसएनएलचा तोटा सर्वाधिक आहे. 2018-19 मध्ये बीएसएनएल कंपनीला 7 हजार 500 कोटींचा तोटा झाला. तर 2017-18 मध्ये एअर इंडियाला 5,337 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पोस्ट खात्याला 2018-19 मध्ये 18 हजार कोटींचा महसूल मिळाला. यातील 16,620 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्त्यावर खर्च झाले. याशिवाय बीएसएनएलला वर्षाकाठी 9,782 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर खर्च करावे लागतात. बीएसएनएल दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांवर 26,400 कोटी रुपये खर्च करतं. 2020 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 17,451 कोटी रुपये आणि निवृत्ती वेतनावर 10,271 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. या काळात कंपनीचं उत्पन्न 19,203 कोटी रुपये असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बीएसएनएलचा पाय आणखी खोलात जाणार आहे.  

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसBSNLबीएसएनएलAir Indiaएअर इंडिया