शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भारताच्या हवाई हद्दीतून इम्रान खानना उड्डाणाची परवानगी; श्रीलंका दौऱ्याचा अडथळा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 12:43 IST

India permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून देण्यात आली आहे. इम्रान खान प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देइम्रान खानला भारतीय हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगीइम्रान खान प्रथमच श्रीलंका दौऱ्यावरइम्रान खान यांच्या श्रीलंका दौऱ्यातील अडथळा दूर

नवी दिल्ली :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून देण्यात आली आहे. इम्रान खान प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे. (India permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka)

एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी भारतीय हवाई क्षेत्रातून त्यांचे विमान जाणार असल्याने त्यासाठी भारताकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या श्रीलंका दौऱ्यातील अडथळा दूर झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यासाठी परवानगी नाकारली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असताना पाकिस्तानने आडमुठेपणा करत हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याची सबब पाकिस्तानने दिली होती. 

लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप

सामान्य परिस्थितीत व्हीव्हीआयपी विमानांना उड्डाणासाठी देशांकडून परवानगी दिली जाते. मात्र पाकिस्तानने परवानगी नाकारणे नियमाचे उल्लंघन असल्याचा आक्षेप घेत व्हीव्हीआयपी विमानाला परवानगी नाकारण्याचा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडे उपस्थित केला होता. 

तत्पूर्वी, जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून इम्रान खान वारंवार भारतावर टीका करत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताविरोधात पाकिस्तानकडून गरळ ओकणे सुरूच असते. भारताकडून बहुतांश वेळेस पाकिस्तानसमोर मैत्रीचा आणि सीमाभागात शांततेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानही भूमिका असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अलीकडेच इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला होता. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारत