शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 11:45 IST

सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत.

नवी दिल्ली - पाकिस्तानसोबत असलेल्या तणावात सलग चौथ्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्याची आणि खोट्या दाव्याची माहिती दिली. पाकिस्तानने भारताच्या सैन्य स्थळावर हल्ल्याचा प्रयत्न केला तो भारतीय सैन्याने हाणून पाडला. एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. नागरी विमानांचा चुकीचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून केला जात असल्याचं सोफिया कुरेशी यांनी म्हटलं. त्याशिवाय पाककडून सुरू असलेल्या खोट्या दाव्याचा बुरखाही पत्रकार परिषदेत फाडण्यात आला.

पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं की, पाकिस्तानी सैन्याने पश्चिमी सीमेवर हल्ले केले आहेत. भारतीय सैन्य तळांना टार्गेट करण्याचा पाकने प्रयत्न केला. एलओसीवर सातत्याने गोळीबार केला जात आहे. श्रीनगरपासून अनेक ठिकाणांवरून हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने उत्तर दिले. उधमपूर, भटिंडासारख्या ठिकाणी उपकरणांना नुकसान पोहचवले. पंजाबच्या एअरपेसवर मिसाईड डागण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांना टार्गेट केले. भारतीय सैन्यानेही पाकचे हल्ले परतावून लावले. पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत असल्याने भारतीय सैन्याने संयमाने प्रत्युत्तर दिले आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत. कुपवाडा, बारामुला, पुंछ आणि अखनूर सेक्टरमध्ये तोफ, मोर्टार आणि सौम्य शस्त्राने भीषण गोळीबार केला जात आहे. भारतीय सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय एअरफोर्सला नुकसान पोहचवल्याचा पाकचा दावा खोटा आहे. सिरसा, सूरत एअरबेसचे व्हिडिओ, फोटो पत्रकार परिषदेत दाखवत इथे कोणतेही नुकसान नाही असं सांगण्यात आले. त्याशिवाय भारत धार्मिक स्थळांवर हल्ले करतेय, अफगाणिस्तानवरही मिसाईल फेकली यासारख्या अनेक खोट्या दाव्यांची पोलखोल कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावात जी७ देशाने प्रतिक्रिया देत दोन्ही देशातील तणाव कमी करण्याचा आग्रह धरला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. या दोन्ही देशात सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत. त्यात जी ७ सदस्य कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपीय संघाने दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधींशी तणाव कमी करण्याचं आवाहन केले आहे. दोन्ही देशातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे दोन्ही देशांनी तात्काळ तणाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं जी ७ देशांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला