शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:11 IST

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्याने जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला. ऑपरेशन सिंदूरमध्येभारतीय सैन्याने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकचा चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ले करत पाकिस्तानातील एअरबेस उद्ध्वस्त केले.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र १० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार दोन्ही बाजून तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली. या घटनेनंतर देशातील जनतेला काय वाटते, याबाबत सी वोटरने सर्व्हे केला आहे. यात लोकांना पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचललेल्या पावलाने समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेने सी वोटरचा सर्व्हे पुढे आणला आहे. ज्यात लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी वोटरने हा सर्व्हे १०, ११ आणि १२ मे रोजी केला आहे.

प्रश्न - मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का?

या प्रश्नावर ६८.१ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले. या कारवाईमुळे ६८.१ टक्के लोक समाधानी आहेत. तर ५.३ टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत. १५.३ टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ६३.३ टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत. १०.२ टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती. युद्धविरामवर १७.३ टक्के लोकांनी उत्तर देणे टाळले.

प्रश्न - चीन आणि पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

युद्धविरामच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी मते नोंदवली. युद्धविराम होण्यापूर्वी ४७.४ टक्के लोकांनी चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे म्हटलं तर २७.७ टक्के लोकांनी पाकिस्तानला मोठा शत्रू मानले. १२.२ टक्के लोकांनी हे दोन्ही पर्याय निवडले. युद्धविरामनंतर ५१.८ टक्के लोकांना चीन तर १९.६ टक्के लोकांना पाकिस्तान भारताचा मोठा शत्रू आहे असं वाटते.  तर २०.७ टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचे सांगितले.

प्रश्न - भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास?

सी वोटरच्या सर्व्हेनुसार, युद्धविरामआधी ९१.१ टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरवसा असल्याचे म्हटले तर ६.१ टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचे म्हटले. १ टक्के लोकांनी विश्वास नसल्याचे सांगितले. युद्धविराम झाल्यानंतर ९२.९ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला तर ०.७ टक्के लोकांनी अविश्वास दर्शवला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत