शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:11 IST

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्याने जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला. ऑपरेशन सिंदूरमध्येभारतीय सैन्याने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकचा चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ले करत पाकिस्तानातील एअरबेस उद्ध्वस्त केले.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र १० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार दोन्ही बाजून तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली. या घटनेनंतर देशातील जनतेला काय वाटते, याबाबत सी वोटरने सर्व्हे केला आहे. यात लोकांना पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचललेल्या पावलाने समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेने सी वोटरचा सर्व्हे पुढे आणला आहे. ज्यात लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी वोटरने हा सर्व्हे १०, ११ आणि १२ मे रोजी केला आहे.

प्रश्न - मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का?

या प्रश्नावर ६८.१ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले. या कारवाईमुळे ६८.१ टक्के लोक समाधानी आहेत. तर ५.३ टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत. १५.३ टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ६३.३ टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत. १०.२ टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती. युद्धविरामवर १७.३ टक्के लोकांनी उत्तर देणे टाळले.

प्रश्न - चीन आणि पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

युद्धविरामच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी मते नोंदवली. युद्धविराम होण्यापूर्वी ४७.४ टक्के लोकांनी चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे म्हटलं तर २७.७ टक्के लोकांनी पाकिस्तानला मोठा शत्रू मानले. १२.२ टक्के लोकांनी हे दोन्ही पर्याय निवडले. युद्धविरामनंतर ५१.८ टक्के लोकांना चीन तर १९.६ टक्के लोकांना पाकिस्तान भारताचा मोठा शत्रू आहे असं वाटते.  तर २०.७ टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचे सांगितले.

प्रश्न - भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास?

सी वोटरच्या सर्व्हेनुसार, युद्धविरामआधी ९१.१ टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरवसा असल्याचे म्हटले तर ६.१ टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचे म्हटले. १ टक्के लोकांनी विश्वास नसल्याचे सांगितले. युद्धविराम झाल्यानंतर ९२.९ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला तर ०.७ टक्के लोकांनी अविश्वास दर्शवला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत