शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:11 IST

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्याने जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला. ऑपरेशन सिंदूरमध्येभारतीय सैन्याने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकचा चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ले करत पाकिस्तानातील एअरबेस उद्ध्वस्त केले.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र १० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार दोन्ही बाजून तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली. या घटनेनंतर देशातील जनतेला काय वाटते, याबाबत सी वोटरने सर्व्हे केला आहे. यात लोकांना पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचललेल्या पावलाने समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेने सी वोटरचा सर्व्हे पुढे आणला आहे. ज्यात लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी वोटरने हा सर्व्हे १०, ११ आणि १२ मे रोजी केला आहे.

प्रश्न - मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का?

या प्रश्नावर ६८.१ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले. या कारवाईमुळे ६८.१ टक्के लोक समाधानी आहेत. तर ५.३ टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत. १५.३ टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ६३.३ टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत. १०.२ टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती. युद्धविरामवर १७.३ टक्के लोकांनी उत्तर देणे टाळले.

प्रश्न - चीन आणि पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

युद्धविरामच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी मते नोंदवली. युद्धविराम होण्यापूर्वी ४७.४ टक्के लोकांनी चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे म्हटलं तर २७.७ टक्के लोकांनी पाकिस्तानला मोठा शत्रू मानले. १२.२ टक्के लोकांनी हे दोन्ही पर्याय निवडले. युद्धविरामनंतर ५१.८ टक्के लोकांना चीन तर १९.६ टक्के लोकांना पाकिस्तान भारताचा मोठा शत्रू आहे असं वाटते.  तर २०.७ टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचे सांगितले.

प्रश्न - भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास?

सी वोटरच्या सर्व्हेनुसार, युद्धविरामआधी ९१.१ टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरवसा असल्याचे म्हटले तर ६.१ टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचे म्हटले. १ टक्के लोकांनी विश्वास नसल्याचे सांगितले. युद्धविराम झाल्यानंतर ९२.९ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला तर ०.७ टक्के लोकांनी अविश्वास दर्शवला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत