शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:11 IST

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्याने जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला. ऑपरेशन सिंदूरमध्येभारतीय सैन्याने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकचा चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ले करत पाकिस्तानातील एअरबेस उद्ध्वस्त केले.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र १० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार दोन्ही बाजून तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली. या घटनेनंतर देशातील जनतेला काय वाटते, याबाबत सी वोटरने सर्व्हे केला आहे. यात लोकांना पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचललेल्या पावलाने समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेने सी वोटरचा सर्व्हे पुढे आणला आहे. ज्यात लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी वोटरने हा सर्व्हे १०, ११ आणि १२ मे रोजी केला आहे.

प्रश्न - मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का?

या प्रश्नावर ६८.१ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले. या कारवाईमुळे ६८.१ टक्के लोक समाधानी आहेत. तर ५.३ टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत. १५.३ टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ६३.३ टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत. १०.२ टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती. युद्धविरामवर १७.३ टक्के लोकांनी उत्तर देणे टाळले.

प्रश्न - चीन आणि पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?

युद्धविरामच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी मते नोंदवली. युद्धविराम होण्यापूर्वी ४७.४ टक्के लोकांनी चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे म्हटलं तर २७.७ टक्के लोकांनी पाकिस्तानला मोठा शत्रू मानले. १२.२ टक्के लोकांनी हे दोन्ही पर्याय निवडले. युद्धविरामनंतर ५१.८ टक्के लोकांना चीन तर १९.६ टक्के लोकांना पाकिस्तान भारताचा मोठा शत्रू आहे असं वाटते.  तर २०.७ टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचे सांगितले.

प्रश्न - भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास?

सी वोटरच्या सर्व्हेनुसार, युद्धविरामआधी ९१.१ टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरवसा असल्याचे म्हटले तर ६.१ टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचे म्हटले. १ टक्के लोकांनी विश्वास नसल्याचे सांगितले. युद्धविराम झाल्यानंतर ९२.९ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला तर ०.७ टक्के लोकांनी अविश्वास दर्शवला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत