शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:42 IST

India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान वेडापिसा झाला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्काराकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमधील सीमेवरील गावांमध्ये उखळी तोफा आणि तोफगोळे डागण्याचे प्रयत्न झाले. ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये काही हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. (Pakistan attempted to engage a number of military targets in Northern and Western India)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तान लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले नव्हते. पण, पाकिस्तान लष्कराकडून जर भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. 

पाकिस्तानकडून मध्यरात्री हल्ल्याचे प्रयत्न

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ आणि ८ मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांचा समावेश आहे. 

वाचा >>भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यूएसए ग्रीड आणि हवाई संरक्षण सिस्टिमच्या मदतीने त्यांच्या मिसाईल आणि ड्रोन पाडण्यात आले. अनेक ठिकाणी पाडण्यात आलेल्या ड्रोन्स आणि मिसाईलचे सांगाडे सापडले आहेत. त्यातून पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. 

लाहोरमधील एअर डिफेन्स रडार केले निकामी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानची ठिकठिकाणची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याप्रमाणेच भारताने उत्तर दिले. जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्यात यश आले आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगतच्या गावात अंदाधूं गोळीबार केला जात आहे. यात आतापर्यंत १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. यात तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारतीय जवानही पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक