शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

"बुद्धिमान आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:48 IST

P Chidambaram And Narendra Modi : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. दहशतवाद संपवण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही हे भारताने सिद्ध केलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आपल्या कॉलममध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व क्षमतेचं खूप कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर बुद्धिमान आणि संतुलित असल्याचं त्यांनी सांगितलं. कॉलममध्ये असंही लिहिलं आहे की, "२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी घटनेनंतर सर्वजण दहशतवाद्यांकडून बदला घेण्याची मागणी करत होते. अशा परिस्थितीत सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठं युद्ध टाळलं आहे."

"भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर"

"भारताने केलेली कारवाई अत्यंत मर्यादित आणि सुनियोजित होती. ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणं होता." चिदंबरम यांनी त्यांच्या कॉलममध्ये या कारवाईला पंतप्रधान मोदींचं एक समजुतदारपणाचं पाऊल असं म्हटलं आहे. तसेच चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात ७ मे रोजी भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्याचे कौतुक केलं आहे. भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर आणि लक्ष्य केंद्रीत होती. भारतीय लष्कराने त्यांच्या हवाई हल्ल्यादरम्यान लष्करी आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलं नाही. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद, दार रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचा पूर्णपणे खात्मा झाला आहे असं मानणं थोडी घाई ठरू शकते असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत. हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTerror Attackदहशतवादी हल्ला