शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:48 IST

P Chidambaram And Narendra Modi : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. दहशतवाद संपवण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही हे भारताने सिद्ध केलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आपल्या कॉलममध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व क्षमतेचं खूप कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित असल्याचं त्यांनी सांगितलं. कॉलममध्ये असंही लिहिलं आहे की, "२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी घटनेनंतर सर्वजण दहशतवाद्यांकडून बदला घेण्याची मागणी करत होते. अशा परिस्थितीत सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठं युद्ध टाळलं आहे."

"भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर"

"भारताने केलेली कारवाई अत्यंत मर्यादित आणि सुनियोजित होती. ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणं होता." चिदंबरम यांनी त्यांच्या कॉलममध्ये या कारवाईला पंतप्रधान मोदींचं एक समजुतदारपणाचं पाऊल असं म्हटलं आहे. तसेच चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात ७ मे रोजी भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्याचं कौतुक केलं आहे. भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर आणि लक्ष्य केंद्रीत होती. भारतीय लष्कराने त्यांच्या हवाई हल्ल्यादरम्यान लष्करी आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलं नाही. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद, दार रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचा पूर्णपणे खात्मा झाला आहे असं मानणं थोडी घाई ठरू शकते असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत. हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTerror Attackदहशतवादी हल्ला