शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 00:49 IST

India Pakistan Conflict: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्ताननेभारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी युद्धाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी प्रचंड संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या अफवा पसरत असून, त्यामुळे सामान्य माणूस गोंधळून जात आहे. दरम्यान, या युद्धसदृश परिस्थितीतमध्ये कोणती खबरदारी घेतली पाहिजे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे.

 युद्ध काळात काय करू नये-सर्वप्रथम तुम्ही जिथे राहता त्या शहराचं लोकेशन, ब्लॅकआऊटची माहिती आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका.- जर तुमच्या शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात लष्कराचं कुठलंही वाहन दिसलं तर त्याचा व्हिडीओ काढू नका- युद्धाबाबत सोशल मीडियावर बरेचसे जुने फोटो ताजे फोटो म्हणून शेअर केले जात आहेत, अशा अफवांकडे दुर्लक्ष करा. -गरज नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, तसेच आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका-चुकीच्या माहितीबाबत प्रतिक्रिया देऊ नका, भीती आणि आक्रोषित होऊन कुठलंही बेकायदेशीर पाऊल उचलू नका.-सुरक्षा दलांच्या कामामध्ये अडथळे आणू नका. त्यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करा

युद्धकाळात या गोष्टी अवश्य करा - सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, केवळ सरकारी संस्था, लष्कर, स्थानिक प्रशासन या विश्वसनीय संस्थांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा,- आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार राहा, आवश्यक औषधे, कागदपत्रे, पाणी आणि सुकं धान्य गोळा करून ठेवा-सुरक्षित ठिकाणांची ओळख पटवा आणि घर किंवा गल्लीत असलेला बंकर किंवा भक्कम बांधकाम असलेल्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या- सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता बाळगा, अफवा टाळा आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवा- वृद्ध, मुले आणि अपंगांना प्राधान्य द्या आणि गरज भासल्यास त्यांना मदत करा. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान