शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:18 IST

India Pakistan Conflict: गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणांना लक्ष्य करत ३०० ते ४०० ड्रोनच्यामाध्यमातून हल्ला केला. दरम्यान, यापैकी बहुतांश ड्रोन हे निशस्त्र होते. पाकिस्तानने भारतातील संरक्षण केंद्रांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला होता, अशी धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि प्रत्युत्तरदाखल भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थितीत निर्माण झाली असतानाच गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणांना लक्ष्य करत ३०० ते ४०० ड्रोनच्यामाध्यमातून हल्ला केला. दरम्यान, यापैकी बहुतांश ड्रोन हे निशस्त्र होते. पाकिस्तानने भारतातील संरक्षण केंद्रांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला होता, अशी धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन हे तुर्कीमधील होते, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.  परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ८ मे रोजी भारतातील विविध शहरांवर झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी सैन्याने तुर्कीमध्ये निर्मिती झालेले ड्रोन वापरले असण्याची शक्यता आहे. ड्रोनच्या अवशेषांच्या प्राथमिक तपासांमधून हे ड्रोन तुर्कीमधील Assisguard Songar मॉडेलचे होते, अशी माहिती समोर आली आहे. या ड्रोनचा वापर टेहेळणी आणि अचूक हल्ल्यांसाठी केला जातो. 

याबाबत अधिक माहिती देताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, ८ आणि ९ मे दरम्यानच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण पश्चिमेच्या सीमावर्ती भागामध्ये भारताच्या हवाई हद्दीचं अनेकदा उल्लंघन केलं, या हल्ल्याचा उद्देश भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा होता. तसेच पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला.

त्यांनी पुढे सांगितले की, सीमारेषेवरून मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून सर क्रिकपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन आणि इतर घातक पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, पाकिस्तानच्या या हल्ल्याचा उद्देश भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमच्या क्षमतेची तपासणी करणे आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा होता. पाकिस्तानकडून ड्रोन पाठवण्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे आमि भारतीय लष्कराच्या सैनिकी ठिकाणांबाबत माहिती मिळवणे हा असू शकतो.

या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, पाकिस्तानचा एक सशस्त्र ड्रोन भटिंडा येथील लष्करी केंद्राला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली होती. मात्र हे ड्रोनही वेळीच नष्ट करण्यात आले. दरम्यान, भारताने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने चार पाकिस्तानी एअर डिफेन्स साइट्सवर सशस्त्र ड्रोन पाठवले होते. त्यपैकी एका ड्रोनने एक एअर डिफेन्स रडार नष्ट केला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान