शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धविराम, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:07 IST

India Pakistan Conflict : एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला सवाल केले आहेत.

India Pakistan Conflict ( Marathi News ) :  पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सीमेवर गोळीबार झाल्याचे समोर आले, या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काल अमेरिकेने मध्यस्ती करत 'युद्धविराम 'ची घोषणा केली. दरम्यान, एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सरकारला एक सवाल केला आहे.

वारिस पठाण यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करु सवाल उपस्थित केले, "एक प्रश्न, पहलगाममधील त्या क्रूर दहशतवाद्यांचे काय झाले ज्यांनी निष्पाप पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून त्यांची हत्या केली? त्यांना पकडले गेले का? त्यांना मारले गेले का?", असा सवाल वारिस पठाण यांनी केला. 

भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे गेले?

हल्ल्यानंतर पहलगाममध्ये घुसलेले दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना होती. काश्मीरमधील स्थानिक लोकांनी किंवा कामगारांनी त्यांना मदत केली असावी, तरच त्यांना सीमा ओलांडून लपणे शक्य झाले. हल्ल्यानंतर, भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जमांची हत्या केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेश सिंदूर' मोहिम राबवली. या अंतर्गत लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर हल्ला केला.

भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे धाडस दाखवले. यानंतर पाकिस्तानने हल्ले करण्यास सुरूवात केली. या हल्ल्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून येणारे बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली आणि त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले.

यानंतर, शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५:०० वाजता युद्धबंदी करार झाला. असे असूनही, पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया थांबवल्या नाहीत आणि काही तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला