शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धविराम, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:07 IST

India Pakistan Conflict : एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला सवाल केले आहेत.

India Pakistan Conflict ( Marathi News ) :  पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सीमेवर गोळीबार झाल्याचे समोर आले, या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, काल अमेरिकेने मध्यस्ती करत 'युद्धविराम 'ची घोषणा केली. दरम्यान, एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सरकारला एक सवाल केला आहे.

वारिस पठाण यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करु सवाल उपस्थित केले, "एक प्रश्न, पहलगाममधील त्या क्रूर दहशतवाद्यांचे काय झाले ज्यांनी निष्पाप पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून त्यांची हत्या केली? त्यांना पकडले गेले का? त्यांना मारले गेले का?", असा सवाल वारिस पठाण यांनी केला. 

भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे गेले?

हल्ल्यानंतर पहलगाममध्ये घुसलेले दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना होती. काश्मीरमधील स्थानिक लोकांनी किंवा कामगारांनी त्यांना मदत केली असावी, तरच त्यांना सीमा ओलांडून लपणे शक्य झाले. हल्ल्यानंतर, भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जमांची हत्या केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेश सिंदूर' मोहिम राबवली. या अंतर्गत लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर हल्ला केला.

भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे धाडस दाखवले. यानंतर पाकिस्तानने हल्ले करण्यास सुरूवात केली. या हल्ल्याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून येणारे बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली आणि त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले.

यानंतर, शनिवारी (१० मे) संध्याकाळी ५:०० वाजता युद्धबंदी करार झाला. असे असूनही, पाकिस्तानने आपल्या नापाक कारवाया थांबवल्या नाहीत आणि काही तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला