शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:35 IST

Brahmaputra river latest news : ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : व्यापाराच्या मुद्द्यावर अमेरिकेशी तणाव वाढलेला असतानाच भारत सरकार चीनशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांबाबत अत्यंत सावध आहे. अरुणाचल प्रदेशजवळ ब्रह्मपुत्रा नदीवरचीनने एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे का, असा प्रश्न संसदेत गुरुवारी विचारण्यात आला होता, तेव्हा वरील बाब पुढे आली. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की, तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीच्या खालच्या भागात (म्हणजेच ब्रह्मपुत्राच्या वरच्या भागात) चीनने एक महाकाय धरण प्रकल्प बांधण्यास सुरुवात केल्याच्या वृत्तांची सरकारने दखल घेतली आहे.

ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे. 

चीनला सांगितली चिंतासीमापार नद्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन झालेल्या यंत्रणेमार्फत तसेच राजनैतिक मार्गांद्वारे चीनशी चर्चा केली जाते. मंत्री म्हणाले की, सीमापार नद्यांच्या पाणीहक्काबाबत भारताने चीनच्या अधिकाऱ्यांना सातत्याने आपले विचार आणि चिंता कानावर घातल्या आहेत. यात पारदर्शकता आणि संबंधित देशाशी सल्ला-मसलत करण्याची गरजही व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कोणत्याही प्रकल्पांमुळे किंवा उपक्रमांमुळे नदीचे पाणी मिळणाऱ्या देशांच्या हिताला हानी पोहोचणार नाही, याची खात्री करण्याचेही आवाहन केलेले आहे.

टॅग्स :chinaचीनriverनदीIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश