शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

या चिमण्यांनो परत फिरा रे...भारताचा 'नेस्ट मॅन' ज्यानं चिमण्यांसाठी बनवलीत २,५०,००० घरटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:56 IST

राकेश खत्री यांना 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं. त्यांनी देशभरात पक्ष्यांसाठी २,५०,००० घरटी बनवली आहेत.

नवी दिल्ली-

राकेश खत्री यांना 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं. त्यांनी देशभरात पक्ष्यांसाठी २,५०,००० घरटी बनवली आहेत. ते म्हणतात की निसर्गाला आपली गरज नाही, आपल्याला निसर्गाची गरज आहे. यामध्ये कोणताही असमतोल सर्वांसाठी धोक्याचा ठरेल. हाच विचार करून त्यांनी पक्ष्यांची घरटी बनवण्याची मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसायचे. पण, राकेश खत्री यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यांना पक्ष्यांचा किलबिलाट आवडतो. पक्षी जिथे जिथे धान्य टिपताना दिसतात तिथं ते घरटी बनवू लागतात. येणाऱ्या पिढीला देखील ते याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळकरी मुलांना पक्ष्यांची घरटी बनवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी ते देशभरात फिरतात.

राकेश खत्री यांचे बालपण दिल्लीतील चांदनी चौकात गेलं. त्यांच्या घराच्या गच्चीवर बरीच घरटी होती. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पक्षी पिसांच्या आत घरटी बनवायचे. १९८० मध्ये ते अशोक नगर येथे स्थलांतरित झाले. झपाट्यानं नागरीकरण होत होतं. जंगलं, फळबागा नाहीशा होत होत्या. पक्ष्यांची घरटी दिसणं बंद झालं होतं. यानं तो अस्वस्थ होत होता. मग त्यांनी पक्ष्यांची घरटी स्वतः बांधायचं ठरवलं.

लोकांनी माझी चेष्टा केलीराकेश यांनी असं ठरवलं तेव्हा लोकांनी त्यांची चेष्टा केली. पक्षी स्वतःची घरटी बनवतात असं ते म्हणायचं. माणसानं बनवलेल्या घरट्यात ते का राहायला येतील? सुरुवातीला त्यांनी नारळापासून घरटी बनवली. अशी ४० घरटी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांनी पाहिलं तर त्यात एकही पक्षी नव्हता. यामुळे लोकांनी त्यांची खूप खिल्ली उडवली. मात्र, राकेश थांबले नाहीत. याबाबत त्यांनी अधिक संशोधन केलं. नंतर बांबूच्या काड्यांनी घरटी बनवली. यावेळी त्यांना यश मिळालं.

शाळेतील मुलांना घरटी बनवण्याचं प्रशिक्षणचिमण्यांची घरटी बनवण्यासाठी नारळाची पोळी, बांबू, कापूस, ताग इत्यादींचा वापर केला जातो. त्यांनी देशभरातील ३,५०० शाळांमध्ये घरटी बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या 'इकोरूट्स फाउंडेशन'च्या माध्यमातून ते पक्षी वाचवण्याच्या कामात गुंतले आहेत.

राकेश खत्रींच्या मतानुसार यापेक्षा मोठं चांगलं कार्य असूच शकत नाही. माणसांनी पक्ष्यांचं घर हिरावून घेतलं आहे. आता स्वतःचं घर बांधण्याची जबाबदारी त्यांची आहे. आपल्याला निसर्गाची गरज आहे. निसर्ग आपला नाही. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर निसर्गाशी एकरूप होऊन काम करावं लागेल. त्याचं कारण म्हणजे निसर्ग हा आपल्या सर्वांचा पालक आहे, असंही ते म्हणतात.