शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

"चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:11 IST

Sam Pitroda News: जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे

भारत आणि चीनमधील सीमारेषा ही जगातील सर्वात वादग्रस्त सीमांपैकी एक आहे. तसेच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या सीमेवर वारंवार वादही निर्माण होत असतात. पाच वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये भीषण झटापट होऊन त्यात दोन्हीकडच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी भारत आणि चीनमधील संबंधांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. भारत आणि चीनमधील वाद अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडला जातो, असा दावा त्यांनी केला आहे. भारताने या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र दोन्ही देशांनी आता सहकार्याच्या मार्गावरून पुढे गेलं पाहिजे. असा दावाही सॅम पित्रोडा यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनपासून निर्माण होणाऱ्या धोक्याला रोखण्यात यशस्वी होतील का, असं विचारलं असता सॅम पित्रोडा म्हणाले की, चीनपासून काय घोका आहे, हे मला समजत नाही. अमेरिका नेही शत्रू निश्चित करण्याचं धोरण अवलंबतो. त्यामुळे भारत आणि चीनमधील वादाला नेहमी अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडलं जातं.

पित्रोडा पुढे म्हणाले की, जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. तसेच चीन सुरुवातीपासून आपला शत्रू आहे, हे समजणं बंद केलं पाहिजे. ही भूमिका केवळ चीनबाबत नाही तर सर्व देशांबाबत असली पाहिजे, असेही पित्रोडा यांनी पुढे सांगितले.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcongressकाँग्रेसIndiaभारतUnited Statesअमेरिकाchinaचीन