शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:11 IST

Sam Pitroda News: जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे

भारत आणि चीनमधील सीमारेषा ही जगातील सर्वात वादग्रस्त सीमांपैकी एक आहे. तसेच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे या सीमेवर वारंवार वादही निर्माण होत असतात. पाच वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये भीषण झटापट होऊन त्यात दोन्हीकडच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी भारत आणि चीनमधील संबंधांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. भारत आणि चीनमधील वाद अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडला जातो, असा दावा त्यांनी केला आहे. भारताने या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र दोन्ही देशांनी आता सहकार्याच्या मार्गावरून पुढे गेलं पाहिजे. असा दावाही सॅम पित्रोडा यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनपासून निर्माण होणाऱ्या धोक्याला रोखण्यात यशस्वी होतील का, असं विचारलं असता सॅम पित्रोडा म्हणाले की, चीनपासून काय घोका आहे, हे मला समजत नाही. अमेरिका नेही शत्रू निश्चित करण्याचं धोरण अवलंबतो. त्यामुळे भारत आणि चीनमधील वादाला नेहमी अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडलं जातं.

पित्रोडा पुढे म्हणाले की, जगाने आता परस्पर संघर्ष सोडून सहकार्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. आपलं धोरण हे सुरुवातीपासून संघर्षाचं राहिलं आहे. या भूमिकेमुळे देशात पाठिंबा तर मिळतो. मात्र त्यामुळे द्विराष्ट्रीय संबंधात कटूता निर्माण होते. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. तसेच चीन सुरुवातीपासून आपला शत्रू आहे, हे समजणं बंद केलं पाहिजे. ही भूमिका केवळ चीनबाबत नाही तर सर्व देशांबाबत असली पाहिजे, असेही पित्रोडा यांनी पुढे सांगितले.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcongressकाँग्रेसIndiaभारतUnited Statesअमेरिकाchinaचीन