शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:32 AM

भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

गुवाहाटी - भारत एक हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला आहे. तसंच जेव्हा कोणी हिंदुत्वाशी नातं तोडतो, तेव्हा तो भारताशीही नातं तोडतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. खानपाडा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांना ऐकण्यासाठी 50 हजाराहून जास्त लोकांनी गर्दी केली होती. मोहन भागवत बोलले की, 'भारत आता नला आपला शत्रू मानत नाही, पण पाकिस्तान भारताकडे मैत्रीच्या नजरेतून पाहण्यात अपयशी ठरला आहे'. 'हडप्पा आणि मोहेंजदाडो सध्या पाकिस्तानात आहे. ते भारताचा घटक आहेत, पण पाकिस्तान त्यांची दखल घेऊ इच्छित नाही. पाकिस्तान हिंदुत्व स्विकारु इच्छित नसल्या कारणानेच एक वेगळा देश आहे', असंही ते बोलले आहेत. 

यावेळी मोहन भागवत यांनी बांगलादेशवरही टीका केली. 'बांगलादेशमधील लोक बांगला भाषा बोलत असतानाही तो एक वेगळा देश कशासाठी ? कारण त्या देशाला हिंदुत्वासोबत जुळवून घेण्याची इच्छा नाही', अशी टीका मोहन भागवत यांनी यावेळी केली. मोहन भागवत यांनी सांगितल्यानुसार, हिंदुत्वानेच भारताला एकजूट ठेवलं आहे. इतक्या भाषा, धर्म, परंपरा आणि जीवनशैली असतानाही हिंदुत्वाने सर्वांना एकत्र ठेवलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'हिंदुत्व विविधतेचा स्विकार करतो, विभाजनाचं नाही. यामुळेच भारत एक हिंदू राष्ट्र आहे'.

उत्तर आसाम क्षेत्राकडून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आसामच्या मुख्यमंत्रांसहित राज्यातील अनेक मंत्र्यांनी या परिषदेला हजेरी लावली. यावर बोलताना मोहन भागवत यांनी ही परिषद आमची ताकद दाखवण्यासाठी आयोजित केली नसून लोकांना हिंदुत्वाचं महत्व समजावं यासाठी आयोजित केली असल्याचं सांगितलं. 'भारताने नवीन जागा मिळवण्यासाठी ताकदवान होण्याची गरज नाही, पण मनं जिंकण्यासाठी ताकदवान व्हावं', असं मोहन भागवत बोलले आहेत. हिंदुत्व सर्व तत्वज्ञानांचा सिव्कार करतं, आणि जो कोणी यात सामील होतं त्यांचा स्विकार करतो', असं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूHindutvaहिंदुत्व