शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:33 IST

india pakistan war पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई, पाकच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा कोरडीठाक, शेतीवर परिणाम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारे चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. इतकेच नव्हे, तर भारत आता काश्मिरातील किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारे झेलम नदीचे पाणी रोखण्याचीही तयारी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे पाकमध्ये पाण्याचे मोठे संकट उद्भवू शकते.

चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारे पाणी रविवारी रोखण्यात आले. यामुळे पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाबचे पात्र कोरडे पडले आहे. चिनाब नदी ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा समजली जाते. पंजाब प्रांतातील शेती याच नदीच्या पाण्यावर अवलंबून असून, पिण्याच्या पाण्यासाठीही चिनाबवरच अवलंबून राहावे लागते. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात बगलिहार धरणावरून प्रदीर्घ काळापासून वाद सुरू आहे. या वादात जागतिक बँकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. चिनाबचे पाणी रोखल्यानंतर आता काश्मिरातील किशनगंगा धरणामार्फत झेलम नदीचे पाणी थांबवण्याची योजना भारताने तयार केली आहे.

पाकच्या शेतीचे काय?सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे ९३ टक्के पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. पाकची ८० टक्के शेती या पाण्यावर अवलंबून आहे. 

भारताला कोणता अधिकार?भारत जम्मूच्या रामबनमधील बगलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणांमधून आपल्या बाजूने पाणी कधी सोडायचे आणि कधी रोखायचे याचे वेळापत्रक ठरवू शकतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की, या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय भारत बंद करू शकतो.

हवाईदल प्रमुखांसाेबत पंतप्रधान मोदी यांची पाऊण तास चर्चानवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी अरबी समुद्रातील मार्गांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी हवाईदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. पाऊण तास चाललेल्या या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याबाबत सूत्रांनी कोणतीही माहिती दिली नाही.

दोन पाकिस्तानी हेरांना अटक : पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत.

वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना उत्तरदिल्लीतील भारत मंडपम येथे सनातन संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी म्हणाले की, संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी सुरक्षा दलांसोबत काम करणे आणि भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या चोख उत्तर देणे हे आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान