शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:33 IST

india pakistan war पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई, पाकच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा कोरडीठाक, शेतीवर परिणाम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारे चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. इतकेच नव्हे, तर भारत आता काश्मिरातील किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारे झेलम नदीचे पाणी रोखण्याचीही तयारी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे पाकमध्ये पाण्याचे मोठे संकट उद्भवू शकते.

चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारे पाणी रविवारी रोखण्यात आले. यामुळे पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाबचे पात्र कोरडे पडले आहे. चिनाब नदी ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा समजली जाते. पंजाब प्रांतातील शेती याच नदीच्या पाण्यावर अवलंबून असून, पिण्याच्या पाण्यासाठीही चिनाबवरच अवलंबून राहावे लागते. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात बगलिहार धरणावरून प्रदीर्घ काळापासून वाद सुरू आहे. या वादात जागतिक बँकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. चिनाबचे पाणी रोखल्यानंतर आता काश्मिरातील किशनगंगा धरणामार्फत झेलम नदीचे पाणी थांबवण्याची योजना भारताने तयार केली आहे.

पाकच्या शेतीचे काय?सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे ९३ टक्के पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. पाकची ८० टक्के शेती या पाण्यावर अवलंबून आहे. 

भारताला कोणता अधिकार?भारत जम्मूच्या रामबनमधील बगलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणांमधून आपल्या बाजूने पाणी कधी सोडायचे आणि कधी रोखायचे याचे वेळापत्रक ठरवू शकतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की, या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय भारत बंद करू शकतो.

हवाईदल प्रमुखांसाेबत पंतप्रधान मोदी यांची पाऊण तास चर्चानवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी अरबी समुद्रातील मार्गांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी हवाईदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. पाऊण तास चाललेल्या या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याबाबत सूत्रांनी कोणतीही माहिती दिली नाही.

दोन पाकिस्तानी हेरांना अटक : पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत.

वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना उत्तरदिल्लीतील भारत मंडपम येथे सनातन संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी म्हणाले की, संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी सुरक्षा दलांसोबत काम करणे आणि भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या चोख उत्तर देणे हे आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान