शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Coronavirus: ७३ वर्षांत भारताने एकही प्रतिबंधक लस बनवली नाही; कोरोना लसीला नरेंद्र मोदींमुळे चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:34 IST

कोणत्याही लसीला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारच्या सात विविध संस्थांच्या दाढीला हात लावावा लागतो व गेल्या ७३ वर्षांत भारताने एकही प्रतिबंधक लस तयार केलेली नाही, हे समजले तेव्हा मोदींना धक्काच बसला.

हरीश गुप्ता, राष्ट्रीय संपादक, लोकमत

देशात कोरोना महामारीचा प्रसार सुरू झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच ३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रीगट स्थापन केला. त्यानंतर मोदींनी डॉ. व्ही.के. पॉल यांच्या नेतृत्वाखाली कोरोना लसीसाठी कृतीगट नेमला. नोकरशाही कशी काम करते व वैज्ञानिक आणि डॉक्टरांंमध्येही कशी कंपूबाजी असते हे माहीत असल्यानेच त्यांनी हे केले.

कोणत्याही लसीला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारच्या सात विविध संस्थांच्या दाढीला हात लावावा लागतो व गेल्या ७३ वर्षांत भारताने एकही प्रतिबंधक लस तयार केलेली नाही, हे समजले तेव्हा मोदींना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी सरळ, साधा फतवा काढला : कोणतीही फाइल कोणाही वैज्ञानिकाच्या अथवा एखाद्या संस्थेच्या प्रमुखाच्या टेबलावर पाच कामाच्या दिवसांहून अधिक काळ पडून राहता कामा नये व इतरांची मते घेण्यासह सर्व प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सने तातडीने पूर्ण केल्या जाव्यात. या सर्वांवर डॉ. पॉल यांचा कृतीगट लक्ष ठेवेल, असेही त्यात नमूद केले गेले. याचा परिणाम लगेच दिसला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोना लस विकसित करण्यासाठी लगेच भारत बायोटेकशी करार केला. इतिहासात असे प्रथमच घडले होते. याआधी फ्लूवरील औषधाला मंजुरी देण्यासाठी आयसीएमआर, औषध महानियंत्रक व अन्य संस्थांनी पाच वर्षे लावली होती. मोदींनी अशा प्रकारे लाल फितीला कात्री लावली व लसींना जवळजवळ‘एक खिडकी’ मंजुरी मिळण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या