शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं काश्मीर खो-यातील लोकांना गमावलंय, भाजपाच्या यशवंत सिन्हांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 10:52 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आता काश्मीर मुद्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आता काश्मीर मुद्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतानं काश्मीर खो-यातील लोकांना भावनिकदृष्ट्या गमावले आहे, असे सिन्हा म्हणाले आहेत. शिवाय, काश्मीर समस्येमध्ये पाकिस्तान हा अवश्य तिसरा पक्ष, ही बाब नाकारता येऊ शकत नाही, असे सांगत सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा यांनी काश्मीर मुद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  सिन्हा असेही म्हणालेत की, मी जम्मू काश्मीरमधील लोकांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होत असल्याचे दिसत आहे. ही गोष्टी माझ्यासाठी फार त्रासदायक आहे. तिथल्या लोकांमध्ये दुरावलेपणाची भावना आहे. आपण त्या लोकांना भावनिकदृष्ट्या गमावून बसलो आहे. तेथील परिस्थिती समजून घेण्यासाठी तुम्हाला काश्मीर खो-याला भेट द्यावी लागेल व तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही.

काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी मोदींकडे मागितली होती वेळ नियंत्रण रेषेवर होणा-या हल्ल्यात लोकांच्या बळी जाण्याच्या घटना कमी व्हायला पाहिजेत, कारण तेथे कुणीही युद्ध जिंकत नाहीय. संपूर्ण जग या मुद्यावर पाकिस्तानसोबत नाही तर भारतासोबत आहे, हे कारगिलमुळे सिद्धदेखील झाले आहे. तुम्ही नियंत्रण रेषांना बदलू शकत नाहीत. पाकिस्तानसोबत आपले अनेक मुद्यांवर मतभेद असेल तरीही नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करता येऊ शकते. दरम्यान सिन्हा यांनी असा दावा केला आहे की, 10 महिन्यांपूर्वी त्यांनी काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली होती.  मात्र त्यांना वेळ मिळाली नसल्याचे त्यांनी दुःख आहे, असेही ते म्हणालेत.

वेळ निघून गेलीय

मी खरंच खूप दुःखी आहे. राजीव गांधींपासून भारतातील कोणत्याही पंतप्रधानांनी मला भेटीसाठी वेळ देण्यास कधीही नकार दिला नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही, असे कोणत्याही पंतप्रधानांनी यशवंत सिन्हांना म्हटले नाही आणि हे माझे स्वतःच्याच पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिली नाही. अशा परिस्थितीत पुढील काळात जर कुणी मला फोन करुन म्हणत असेल की कृपया मला येऊन भेटा. तर मला माफ करा. वेळ निघून गेली आहे. मला वाईट वागणूक दिली गेली, अशी खंत यावेळी सिन्हा यांनी व्यक्त केली.

अरुण जेटलींनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली! 

अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु  कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. 

‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले आहे. जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसणे अपरिहार्य असल्याचे भाकित करून सिन्हा म्हणतात, की अर्थव्यवस्था उभारण्यापेक्षा ती खिळखिळी करणे सोपे असते. निवडणूक प्रचारात थापा पचतात. पण एका रात्रीत अर्थव्यवस्थेला उभारी येईल, अशी जादुची कांडी कोणाकडेही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था बाळसे धरू शकत नाही. अत्यंत कडवट भाषेत समारोप करताना सिन्हा लिहितात, की आपण गरिबी फार जवळून पाहिली, असे पंतप्रधान सांगतात. त्यांच्याप्रमाणेच सर्व भारतीयांनाही गरिबीचे चटके बसावेत, यासाठी त्यांचे वित्तमंत्री (जेटली) जिवाचे रान करीत आहेत!