शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:20 IST

भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात असं डोवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली - २०१३ नंतर जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित आहे. भारताने दहशतवादावर नियंत्रण मिळवले आहे. २०१३ नंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. सरकार पटेल स्मारक व्याख्यानात ते बोलत होते. 

यावेळी अजित डोवाल म्हणाले की, तथ्य तर तथ्यच असते, त्यावर कुठलाही वाद होऊ शकत नाही. देशाने दहशतवादाशी अत्यंत प्रभावीपणे लढा दिला. १ जुलै २००५ ला दहशतवादाची मोठी घटना घडली होती. त्यानंतर अखेरची घटना २०१३ साली घडली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर सोडता संपूर्ण देशात कुठेलही दहशतवादी हल्ला झाला नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच जम्मू काश्मीर पाकिस्तानसाठी गुप्त युद्धाचा आखाडा आहे. इथे वेगळा खेळ आहे. त्याशिवाय देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित राहिला. यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. लोकांना अटक करण्यात आल्या. स्फोटके जप्त करण्यात आली. शत्रूच्या कारवाया सुरूच असताना देशातंर्गत कुठेही दहशतवादी हल्ला नाही. २०१४ पासून डाव्या विचारसरणीच्या दहशतवादात झपाट्याने घट झाली आहे. शत्रू अजूनही खूप सक्रिय आहे, परंतु सुदैवाने इतर भागात दहशतवादी घटना घडलेल्या नाहीत. २०१४ च्या तुलनेत ११ टक्क्यांपेक्षा कमी घटना झाल्या आहेत असं त्यांनी सांगितले. 

भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात. आम्ही पुरेसे सुरक्षा उपाय केले आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. तितकेच महत्त्वाचे म्हणजे आपण प्रत्येक भारतीयाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही शक्तींपासून सुरक्षित वाटावे. आपण सरकारी कायदे आणि धोरणांनुसार त्यांच्याशी प्रभावीपणे सामना करू शकतो. सोबतच आपण अशी प्रतिबंधक क्षमता देखील विकसित करू शकलो ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या कोणत्याही धोक्याला सर्वोत्तम पद्धतीने प्रतिसाद देण्याची इच्छाशक्ती आणि ताकद आपल्याकडे आहे हे दिसून येते असंही अजित डोवाल यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : India controlled terrorism after 2013, no major attack: Doval

Web Summary : After 2013, India, excluding J&K, is safe from major terror attacks. Doval credits effective counter-terrorism, arrests, and reduced Left-wing extremism. India has developed aggressive capabilities to counter threats effectively, ensuring national security.
टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालTerror Attackदहशतवादी हल्ला