शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:20 IST

भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात असं डोवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली - २०१३ नंतर जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित आहे. भारताने दहशतवादावर नियंत्रण मिळवले आहे. २०१३ नंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. सरकार पटेल स्मारक व्याख्यानात ते बोलत होते. 

यावेळी अजित डोवाल म्हणाले की, तथ्य तर तथ्यच असते, त्यावर कुठलाही वाद होऊ शकत नाही. देशाने दहशतवादाशी अत्यंत प्रभावीपणे लढा दिला. १ जुलै २००५ ला दहशतवादाची मोठी घटना घडली होती. त्यानंतर अखेरची घटना २०१३ साली घडली होती. त्यानंतर जम्मू काश्मीर सोडता संपूर्ण देशात कुठेलही दहशतवादी हल्ला झाला नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच जम्मू काश्मीर पाकिस्तानसाठी गुप्त युद्धाचा आखाडा आहे. इथे वेगळा खेळ आहे. त्याशिवाय देश दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित राहिला. यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. लोकांना अटक करण्यात आल्या. स्फोटके जप्त करण्यात आली. शत्रूच्या कारवाया सुरूच असताना देशातंर्गत कुठेही दहशतवादी हल्ला नाही. २०१४ पासून डाव्या विचारसरणीच्या दहशतवादात झपाट्याने घट झाली आहे. शत्रू अजूनही खूप सक्रिय आहे, परंतु सुदैवाने इतर भागात दहशतवादी घटना घडलेल्या नाहीत. २०१४ च्या तुलनेत ११ टक्क्यांपेक्षा कमी घटना झाल्या आहेत असं त्यांनी सांगितले. 

भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात. आम्ही पुरेसे सुरक्षा उपाय केले आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. तितकेच महत्त्वाचे म्हणजे आपण प्रत्येक भारतीयाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही शक्तींपासून सुरक्षित वाटावे. आपण सरकारी कायदे आणि धोरणांनुसार त्यांच्याशी प्रभावीपणे सामना करू शकतो. सोबतच आपण अशी प्रतिबंधक क्षमता देखील विकसित करू शकलो ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या कोणत्याही धोक्याला सर्वोत्तम पद्धतीने प्रतिसाद देण्याची इच्छाशक्ती आणि ताकद आपल्याकडे आहे हे दिसून येते असंही अजित डोवाल यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : India controlled terrorism after 2013, no major attack: Doval

Web Summary : After 2013, India, excluding J&K, is safe from major terror attacks. Doval credits effective counter-terrorism, arrests, and reduced Left-wing extremism. India has developed aggressive capabilities to counter threats effectively, ensuring national security.
टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालTerror Attackदहशतवादी हल्ला