शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

सावधान! देशात 4 महिन्यांनंतर एका दिवसांत कोरोनाचे 700 रुग्ण, महाराष्ट्रासह 6 राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 20:33 IST

India Covid-19 Cases: केंद्र सरकारने दिला सावधानतेचा इशारा अन् महत्त्वाचा सल्ला

Covid Cases in India: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सुमारे चार महिन्यांनंतर, भारतात 700 हून अधिक नवीन प्रकरणे एकाच दिवसात नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले आहेत. याची काळजी घेत केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु गेल्या एक आठवड्यापासून प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे की 15 मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारांनी चाचणी, उपचार, ट्रॅक, लसीकरण यावर भर दिला पाहिजे.

केंद्राकडून राज्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला

केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना पत्र लिहून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना चाचणी करणे, कोरोनाच्या प्रकरणावर सतत लक्ष ठेवणे, नवीन फ्लू, विषाणू किंवा इन्फ्लूएंझा यांचे निरीक्षण करणे, जीनोमिक सिंड्रोम चाचणी करणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतात एका दिवसात कोरोनाचे 754 नवे रुग्ण

754 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना बाधितांची संख्या 4,46,92,710 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या 4,623 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी देशात दररोज 734 संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. कर्नाटकमध्ये संसर्गामुळे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर देशातील मृतांची संख्या 5,30,790 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के

आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 4,41,57,297 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.64 कोटी अँटी-कोविड-19 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य