शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 06:30 IST

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले. 

वित्त वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना सीतारामन बोलत होत्या. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तरे दिली, तसेच आक्षेप खोडून काढले.

सीतारामन यांनी म्हटले की, चालू वित्त वर्षासाठी ४८.२१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सरकारने मांडला. त्यातील तरतुदी करताना सामाजिक आणि भौगोलिक समतोल साधण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वर्ग आणि क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले. 

भाषणात नाव नसले म्हणजे तरतूद नाही असे नव्हे !

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. अर्थसंकल्पीय भाषणात एखाद्या राज्याचे नाव नसले म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्या राज्यासाठी काही तरतूदच करण्यात आली नाही. २००४-५ च्या अर्थसंकल्पात १७ राज्यांचे नावे नव्हती. २०१०-११ च्या अर्थसंकल्पात १९ राज्यांची नावे नव्हती. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १० राज्यांची नावे नव्हती.

कोरोना साथीनंतरही अर्थव्यवस्था वेगाने वाढली

सीतारामन यांनी म्हटले की, सरकारने अर्थव्यवस्थेचे उत्तम व्यवस्थापन केले तसेच पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च वाढवला. त्यामुळे कोरोना साथीनंतर आपली अर्थव्यवस्था तेजीने वाढली. आज आपण जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत.

वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर आणणार

सीतारामन यांनी म्हटले की, आपली अर्थव्यवस्था केवळ सुस्थितीतच नाही, तर वित्तीय तूट कमी करण्याच्या मार्गावर प्रगती करीत आहे. वित्तीय तूट २०२५-२६ पर्यंत ४.५ टक्क्यांवर आणण्याचे आपले लक्ष्य आहे. चालू वित्त वर्षात ती ४.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचे सर्व श्रेय अर्थव्यवस्थेच्या उत्तम व्यवस्थापनास जाते. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर ८.२ टक्के राहिला. जगातील सर्वाधिक वृद्धी दर नोंदविण्याचा किताब कायम राखण्यात यशस्वी ठरलो.

हा तर अपमान..

हलवा समारंभाबाबत त्यांनी म्हटले की, ‘अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत हलवा समारंभ हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यावर टीका करणे म्हणजे या कार्यात जुंपून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अवमान आहे.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBudgetअर्थसंकल्प 2024Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन