शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 06:30 IST

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले. 

वित्त वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना सीतारामन बोलत होत्या. अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तरे दिली, तसेच आक्षेप खोडून काढले.

सीतारामन यांनी म्हटले की, चालू वित्त वर्षासाठी ४८.२१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सरकारने मांडला. त्यातील तरतुदी करताना सामाजिक आणि भौगोलिक समतोल साधण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक वर्ग आणि क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले. 

भाषणात नाव नसले म्हणजे तरतूद नाही असे नव्हे !

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. अर्थसंकल्पीय भाषणात एखाद्या राज्याचे नाव नसले म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्या राज्यासाठी काही तरतूदच करण्यात आली नाही. २००४-५ च्या अर्थसंकल्पात १७ राज्यांचे नावे नव्हती. २०१०-११ च्या अर्थसंकल्पात १९ राज्यांची नावे नव्हती. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १० राज्यांची नावे नव्हती.

कोरोना साथीनंतरही अर्थव्यवस्था वेगाने वाढली

सीतारामन यांनी म्हटले की, सरकारने अर्थव्यवस्थेचे उत्तम व्यवस्थापन केले तसेच पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च वाढवला. त्यामुळे कोरोना साथीनंतर आपली अर्थव्यवस्था तेजीने वाढली. आज आपण जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत.

वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर आणणार

सीतारामन यांनी म्हटले की, आपली अर्थव्यवस्था केवळ सुस्थितीतच नाही, तर वित्तीय तूट कमी करण्याच्या मार्गावर प्रगती करीत आहे. वित्तीय तूट २०२५-२६ पर्यंत ४.५ टक्क्यांवर आणण्याचे आपले लक्ष्य आहे. चालू वित्त वर्षात ती ४.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचे सर्व श्रेय अर्थव्यवस्थेच्या उत्तम व्यवस्थापनास जाते. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर ८.२ टक्के राहिला. जगातील सर्वाधिक वृद्धी दर नोंदविण्याचा किताब कायम राखण्यात यशस्वी ठरलो.

हा तर अपमान..

हलवा समारंभाबाबत त्यांनी म्हटले की, ‘अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत हलवा समारंभ हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यावर टीका करणे म्हणजे या कार्यात जुंपून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अवमान आहे.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBudgetअर्थसंकल्प 2024Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन