शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 1:20 PM

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता सीमेवर सर्वात खतरनाक ब्रह्मोस मिसाइल (Brahmos Missile) तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाख आणि अरुणचल प्रदेशात चीनच्या वाढत्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताच्या या निर्णयानं चीनला देखील चांगलीच मिरची झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. कारण चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतानं अशापद्धतीचा निर्णय घेणं हे सीमा वाद शांतीपूर्ण मार्गानं सोडवण्याच्या उद्देशात अडचण निर्माण करणारं ठरू शकतं, असं चीननं म्हटलं आहे. तसंच भारताच्या या निर्णयामुळे चीनसोबतच्या तणावत भर टाकण्याचं काम शेजारील देशानं केल्याचंही म्हटलं आहे. 

ब्रह्मोस मिसाइल तैनात केल्यानं एका बाजूला चीन अस्वस्थ झालेला दिसत असताना दुसरीकडे चीननं भारताच्या शस्त्रांना कमकुवत ठरवलं आहे. भारताची मिसाईल ही केवळ देशाचा तात्विक लाभ आहे. चीनच्या सुरक्षेला याचा अजिबात धोका नाही, असा दावा ग्लोबल टाइम्समध्ये करण्यात आला आहे. "भारताच्या अशापद्धीच्या निर्णयामुळेच दोन्ही देशातील वाद सातत्यानं वाढत आहे आणि विनाकारण दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कटुता निर्माण होत आहे", अशी ओरड चीनी सैन्याचे अधिकारी सोंग झोंगपिंग यांनी केली आहे. 

चीनकडूनही आक्रमक पवित्राचीननंही देशाच्या शस्त्रसाठ्यातील घातक मिसाइल भारतीय सीमेजवळ तैनात केल्या आहेत. भारताच्या ब्रह्मोस मिसाइलचा कोणताच धोका चीनच्या सुरक्षेला नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडे ब्रह्मोस सारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाइल पाडण्याची क्षमता आहे आणि त्यात येत्या काळात आणखी वाढ होणार आहे, असा दावा चीननं केला आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष अटळ असल्यास युद्ध सुरू होण्याआधीच भारताच्या मिसाइल नष्ट करण्यात येतील असाही दावा चीननं केला आहे. 

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसchinaचीन