शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

'मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?' एस जयशंकर यांनी चीनला सुनावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:09 IST

Arunachal Pradesh Row: अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणाऱ्या चीनला जयशंकर यांनी कडक शब्दात सुनावले.

S Jaishankar reply to China:भारताचा शेजारील देश चीन सतत ईशान्येकडील अरुणालच प्रदेशावर आपला दावा सांगतो. यावरुन अनेकदा भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. दरम्यान, आता केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनला कडक शब्दात सुनावले. सोमवारी (1 एप्रिल) मीडियाशी बोलताना जयशंकर म्हणतात, "मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य एलएसीवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील."

दरम्यान, सोमवारीच चीनने भारतातील विविध ठिकाणांच्या 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर केली आहे. यानंतर जयशंकर यांची ही प्रतिक्रिया समोर आली. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी परराष्ट्रमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी चीनला आरसा दाखवला. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे भारताने खंडन केले. 

चीनने अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हटले चीनी सरकारी मीडिया 'ग्लोबल टाईम्स' नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 'जंगनान'मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये "जंगनान" मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

अरुणाचल प्रदेशवर अमेरिकेची प्रतिक्रियाअरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे म्हणत अमेरिकेने यापूर्वीच चीनवर टीका केली होती. तसेच, एलएसीवर सीमा वाढविण्याच्या दिशेने उचललेल्या चीनच्या पावलांचा निषेधही केला होत. 

 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाIndiaभारत