शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

India China FaceOff: चीनला धडा शिकवणार, लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:38 IST

सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील चुशूल येथे चीनने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे संरक्षणविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे गुरुवारपासून लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने सज्ज राहावे, असे आदेश नरवणे यांनी दिल्याचे कळते.सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पँगाँग सरोवरानजीकच्या भागातही चीनने घुसखोरीचा प्रयत्न चालविला असून, तेथील महत्त्वाच्या भागांवर आता भारतीय सैनिकांनी आता मोर्चेबांधणी केली आहे. या सर्व स्थितीचा आढावा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लडाखमधील सैन्याधिकाऱ्यांकडूनघेतला.1962च्या युद्धात चीनने हिसकावून घेतलेली काही पर्वतशिखरेही भारतीय लष्कराने नुकतीच एक गोळी न झाडताही आपल्या ताब्यात घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मोहीम २९ व ३० आॅगस्टच्या रात्री पार पाडण्यात आली.लडाखच्या सीमेवर भारताने अतिरिक्त सैन्य पाठविले असून, अक्साई चीनच्या भागात चीनच्या हवाई दलाच्या विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने या भागात विमानवेधी तोफा, तसेच अन्य प्रकारची शस्त्रास्त्रेही तैनात केली आहेत, तसेच त्यांची संख्या वाढविली आहे.1598 कि.मी. लांब लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. पूर्व लडाखमधील गलवान येथे चिनी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केला असता, त्यांना अडविताना झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.सीमेवरील परिस्थितीचीखरी माहिती द्यावी80 कि़मी. दूरवर चीनचे लष्कर असून, लडाखच्या लेहमधील नेमकी परिस्थिती काय आहे, हे मोदी सरकारने साºया देशाला सांगावे, अशी मागणी लडाखचे माजी आमदार डेल्डन नामग्याल यांनी केली आहे.लडाखच्या सीमेवर चीन व भारताचे सैन्य अत्यंत आक्रमक पवित्र्यात समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली आहे, हे आता मो दी सरकारने मान्य करायला हवे, असेही ते म्हणाले.२० जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावmanoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानladakhलडाख