शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारत चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:57 IST

येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : चीनला धडा शिकवण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले जातील. त्याची सुरुवात ५ जी सेवेचे कंत्राट चिनी हुवाए कंपनीकडून काढून घेण्यात झाली. सौर ऊर्जा उत्पादनांसाठी चीनवर असलेले अवलिंबत्वदेखील कमी केले जाईल. त्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकारने कृषी सौर पंप योजना सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढेल. अशावेळी चिनी कंपन्यांना याचा लाभ घेऊ न देण्यासाठी नवे सौर ऊर्जा धोरण आखण्यात येईल. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, चीनने औषध निर्मितीसाठी आवश्यक घटकांच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वाढ केली. एकप्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रत्त्यूत्तरादाखल ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तू, सीमेलगत असलेल्या देशांमधील गुंतवणूक, मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वेसाठी परदेशी कंपन्यांची सावध निवड करण्याची रणनिती आखली. गेल्या अनेक वर्षांपासून कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट स्थापण्याची चीनची मागणी धुडकावली जाईल.>चर्चेसोबत युद्धाचीही तयारीयुद्ध सिद्धता करून भारताने लष्करी अधिकाऱ्यांसह आता राजनैतिक स्तरावरही चीनसमवेत चर्चेची तयारी दाखवली आहे. चर्चा सुरू असली तरी भारत आपल्या अटींवर ठाम आहे. गलवान खोºयावरील हक्क सांगण्याचा कांगावा कदापि मान्य होणार नसल्याचे संदेश भारताकडून दिले आहेत आहेत. चिनी ड्रॅगनला घेरण्यासाठी केवळ सीमेवरच नव्हे तर आर्थिक, सामरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती भारताने आखली आहे. गलवान खोºयातील झटपटीनंतर स्वत:च्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जगापासून लपवणाºया चिनी राज्यकर्त्यांपासून अजिबात गाफिल न राहण्याची भारताची रणनीती आहे.दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाºयांसह लवकरच राजनैतिक चर्चाही सुरू होईल. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. भारताच्या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण आशिया खंडात चीनच्या भू हव्यासाला मोठा दणका मिळाला.>आकडा लपवणे सुरूचबीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दररोज गलवान खोºयावरून प्रवक्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या दाव्यानुसार चीनचे ४० सैनिक भारतीय जवानांसमवेतच्या झटापटीत मारले गेले. त्यावर झाओ लिजियान यांनी 'तशी माहिती नाही', असे सांगितले.भारत व चीन लष्कर तसेच राजनैतिक स्तरावरील सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी निधीतून चालणाºया चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने झटापटीत पीएलएचे सैनिकही मारले गेल्याचे म्हटले होते. त्यावर चीनकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत