शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

India China FaceOff: भारत चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:57 IST

येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : चीनला धडा शिकवण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले जातील. त्याची सुरुवात ५ जी सेवेचे कंत्राट चिनी हुवाए कंपनीकडून काढून घेण्यात झाली. सौर ऊर्जा उत्पादनांसाठी चीनवर असलेले अवलिंबत्वदेखील कमी केले जाईल. त्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकारने कृषी सौर पंप योजना सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढेल. अशावेळी चिनी कंपन्यांना याचा लाभ घेऊ न देण्यासाठी नवे सौर ऊर्जा धोरण आखण्यात येईल. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, चीनने औषध निर्मितीसाठी आवश्यक घटकांच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वाढ केली. एकप्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रत्त्यूत्तरादाखल ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तू, सीमेलगत असलेल्या देशांमधील गुंतवणूक, मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वेसाठी परदेशी कंपन्यांची सावध निवड करण्याची रणनिती आखली. गेल्या अनेक वर्षांपासून कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट स्थापण्याची चीनची मागणी धुडकावली जाईल.>चर्चेसोबत युद्धाचीही तयारीयुद्ध सिद्धता करून भारताने लष्करी अधिकाऱ्यांसह आता राजनैतिक स्तरावरही चीनसमवेत चर्चेची तयारी दाखवली आहे. चर्चा सुरू असली तरी भारत आपल्या अटींवर ठाम आहे. गलवान खोºयावरील हक्क सांगण्याचा कांगावा कदापि मान्य होणार नसल्याचे संदेश भारताकडून दिले आहेत आहेत. चिनी ड्रॅगनला घेरण्यासाठी केवळ सीमेवरच नव्हे तर आर्थिक, सामरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती भारताने आखली आहे. गलवान खोºयातील झटपटीनंतर स्वत:च्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जगापासून लपवणाºया चिनी राज्यकर्त्यांपासून अजिबात गाफिल न राहण्याची भारताची रणनीती आहे.दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाºयांसह लवकरच राजनैतिक चर्चाही सुरू होईल. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. भारताच्या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण आशिया खंडात चीनच्या भू हव्यासाला मोठा दणका मिळाला.>आकडा लपवणे सुरूचबीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दररोज गलवान खोºयावरून प्रवक्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या दाव्यानुसार चीनचे ४० सैनिक भारतीय जवानांसमवेतच्या झटापटीत मारले गेले. त्यावर झाओ लिजियान यांनी 'तशी माहिती नाही', असे सांगितले.भारत व चीन लष्कर तसेच राजनैतिक स्तरावरील सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी निधीतून चालणाºया चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने झटापटीत पीएलएचे सैनिकही मारले गेल्याचे म्हटले होते. त्यावर चीनकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत