शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

India China FaceOff: भारत चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:57 IST

येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : चीनला धडा शिकवण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले जातील. त्याची सुरुवात ५ जी सेवेचे कंत्राट चिनी हुवाए कंपनीकडून काढून घेण्यात झाली. सौर ऊर्जा उत्पादनांसाठी चीनवर असलेले अवलिंबत्वदेखील कमी केले जाईल. त्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकारने कृषी सौर पंप योजना सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढेल. अशावेळी चिनी कंपन्यांना याचा लाभ घेऊ न देण्यासाठी नवे सौर ऊर्जा धोरण आखण्यात येईल. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, चीनने औषध निर्मितीसाठी आवश्यक घटकांच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वाढ केली. एकप्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रत्त्यूत्तरादाखल ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तू, सीमेलगत असलेल्या देशांमधील गुंतवणूक, मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वेसाठी परदेशी कंपन्यांची सावध निवड करण्याची रणनिती आखली. गेल्या अनेक वर्षांपासून कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट स्थापण्याची चीनची मागणी धुडकावली जाईल.>चर्चेसोबत युद्धाचीही तयारीयुद्ध सिद्धता करून भारताने लष्करी अधिकाऱ्यांसह आता राजनैतिक स्तरावरही चीनसमवेत चर्चेची तयारी दाखवली आहे. चर्चा सुरू असली तरी भारत आपल्या अटींवर ठाम आहे. गलवान खोºयावरील हक्क सांगण्याचा कांगावा कदापि मान्य होणार नसल्याचे संदेश भारताकडून दिले आहेत आहेत. चिनी ड्रॅगनला घेरण्यासाठी केवळ सीमेवरच नव्हे तर आर्थिक, सामरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती भारताने आखली आहे. गलवान खोºयातील झटपटीनंतर स्वत:च्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जगापासून लपवणाºया चिनी राज्यकर्त्यांपासून अजिबात गाफिल न राहण्याची भारताची रणनीती आहे.दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाºयांसह लवकरच राजनैतिक चर्चाही सुरू होईल. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. भारताच्या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण आशिया खंडात चीनच्या भू हव्यासाला मोठा दणका मिळाला.>आकडा लपवणे सुरूचबीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दररोज गलवान खोºयावरून प्रवक्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या दाव्यानुसार चीनचे ४० सैनिक भारतीय जवानांसमवेतच्या झटापटीत मारले गेले. त्यावर झाओ लिजियान यांनी 'तशी माहिती नाही', असे सांगितले.भारत व चीन लष्कर तसेच राजनैतिक स्तरावरील सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी निधीतून चालणाºया चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने झटापटीत पीएलएचे सैनिकही मारले गेल्याचे म्हटले होते. त्यावर चीनकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत