शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

India China FaceOff: भारत चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:57 IST

येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : चीनला धडा शिकवण्यासाठी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रात चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले जातील. त्याची सुरुवात ५ जी सेवेचे कंत्राट चिनी हुवाए कंपनीकडून काढून घेण्यात झाली. सौर ऊर्जा उत्पादनांसाठी चीनवर असलेले अवलिंबत्वदेखील कमी केले जाईल. त्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकारने कृषी सौर पंप योजना सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा वापर वाढेल. अशावेळी चिनी कंपन्यांना याचा लाभ घेऊ न देण्यासाठी नवे सौर ऊर्जा धोरण आखण्यात येईल. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्या कार्यालयात त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, चीनने औषध निर्मितीसाठी आवश्यक घटकांच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क वाढ केली. एकप्रकारे भारतावर दबाव टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने प्रत्त्यूत्तरादाखल ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तू, सीमेलगत असलेल्या देशांमधील गुंतवणूक, मेट्रो रेल्वे, हायस्पीड रेल्वेसाठी परदेशी कंपन्यांची सावध निवड करण्याची रणनिती आखली. गेल्या अनेक वर्षांपासून कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट स्थापण्याची चीनची मागणी धुडकावली जाईल.>चर्चेसोबत युद्धाचीही तयारीयुद्ध सिद्धता करून भारताने लष्करी अधिकाऱ्यांसह आता राजनैतिक स्तरावरही चीनसमवेत चर्चेची तयारी दाखवली आहे. चर्चा सुरू असली तरी भारत आपल्या अटींवर ठाम आहे. गलवान खोºयावरील हक्क सांगण्याचा कांगावा कदापि मान्य होणार नसल्याचे संदेश भारताकडून दिले आहेत आहेत. चिनी ड्रॅगनला घेरण्यासाठी केवळ सीमेवरच नव्हे तर आर्थिक, सामरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती भारताने आखली आहे. गलवान खोºयातील झटपटीनंतर स्वत:च्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जगापासून लपवणाºया चिनी राज्यकर्त्यांपासून अजिबात गाफिल न राहण्याची भारताची रणनीती आहे.दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाºयांसह लवकरच राजनैतिक चर्चाही सुरू होईल. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. भारताच्या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण आशिया खंडात चीनच्या भू हव्यासाला मोठा दणका मिळाला.>आकडा लपवणे सुरूचबीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत दररोज गलवान खोºयावरून प्रवक्त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या दाव्यानुसार चीनचे ४० सैनिक भारतीय जवानांसमवेतच्या झटापटीत मारले गेले. त्यावर झाओ लिजियान यांनी 'तशी माहिती नाही', असे सांगितले.भारत व चीन लष्कर तसेच राजनैतिक स्तरावरील सध्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी निधीतून चालणाºया चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने झटापटीत पीएलएचे सैनिकही मारले गेल्याचे म्हटले होते. त्यावर चीनकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत