शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डिव्हिजन; चीन माघारीस तयार, पण...​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:08 IST

रणगाडे, क्षेपणास्त्रांसह सज्जता; मुकाबल्याची तयारी

सुरेश डुग्गर 

जम्मू : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनशी झालेल्या संघर्षामुळे निर्माण झालेला तणाव नजीकच्या काळात निवळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारतीय लष्कराने तिथे युद्धसज्जतेच्या दिशेने तयारी चालविली असून तीन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. दुसरीकडे चीननेलडाख सीमेवर २० हजार जवान, तर तिबेट भागात १० हजार अतिरिक्त सैनिक आणून ठेवले आहेत.

या भागात भारत व चीनने रणगाडे, तोफा तसेच हवाई संरक्षणासाठी क्षेपणास्त्रेही सज्ज ठेवली आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सध्या तरी चकमकी होण्याची शक्यता नाही असे लष्करी अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र भारतीय लष्कराने सीमा सुरक्षेसाठी व थंडीपासून बचाव अशा दोन उद्दिष्टांसाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर खंदक खोदण्याचे काम सुरू केले आहे.

एका अधिकाºयाने सांगितले की, चीनचे सैन्य लडाखमधील वादग्रस्त भागातून सप्टेंबरपर्यंत मागे न हटल्यास सियाचीन व कारगिल याठिकाणी असलेल्या युद्धस्थितीचा अनुभव वापरून भारतीय लष्कराला हालचाली कराव्या लागतील. सियाचीनमध्ये लढण्याचा व तेथील मोर्चावर तैनात असण्याचा भारतीय जवानांना अनुभव आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर भारतीय लष्कराने चढाई करून त्यांचा पराभव केला होता. कारगिलमध्ये अनेकदा तापमान शून्य अंश सेल्सियस खाली जाते. सियाचीनप्रमाणेच कारगिलमध्येही उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली उतरते.

पूर्व लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तेथील स्थिती लक्षात घेता संरक्षण खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालय केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहे. या सैनिकांना थंडीपासून बचाव करता यावा यासाठीचे कपडे, स्नोबूट, संरक्षणविषयक उपकरणे यांची खरेदी भारतीय लष्कराने आता सुरू केली आहे.चीन माघारीस तयार, पण...पूर्व लडाखच्या सीमेवर चीनचे लष्कर काही किमी मागे हटण्यास तयार आहे. मात्र भारतीय सैन्यानेही काही किमी मागे हटावे, अशी अट चीनने घातली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन देशांच्या कोअर कमांडरांमध्ये मंगळवारी तिसºया टप्प्यातील चर्चा बारा तास चालली. भारतीय लष्कराने दुर्बुक, शयोक, दौलतबेग, ओल्डी रोड या भागांत गस्त घालू नये, अशी चीनने केलेली मागणी भारताने मान्य केली नाही.चीनने पूर्व लडाखच्या सीमेवरील सहा भागांत सैन्य आणून ठेवले असून, ते मागे हटायला तयार नाही.

 

टॅग्स :Indiaभारतindia china faceoffभारत-चीन तणावchinaचीनladakhलडाख