शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 04:01 IST

आर्थिक, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनला भारतात अत्यंत कठोर निर्बंधांचा सामना यापुढेही करावा लागेल. चुशुल चेक पॉर्इंटवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : ईशान्य लद्दाख सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरीचा चिनी सैनिकांचा डाव हाणून पाडल्यानंतर या भागातील तणाव अजूनही कायम आहे. भारतीय जवान आपल्या जागेपासून तसूभरही मागे हटले नसून सलग तिस-या दिवशी भारत-चीनदरम्यान कमांडर स्तरावरील चर्चा पार पडली. अद्याप चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले तरी भारताने पुन्हा एकदा ड्रॅगनला झटका दिला आहे. माहिती व दूरसंचार मंत्रालयाने पबजीसह एकूण १०८ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे.आर्थिक, राजनैतिक, आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनला भारतात अत्यंत कठोर निर्बंधांचा सामना यापुढेही करावा लागेल. चुशुल चेक पॉर्इंटवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सलग दोन दिवस ही चर्चा निष्कर्षाविना संपली. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाºयावरून पुढे सरकणाºया चीनी सैनिकांना भारतीय जवानांनी मागे पिटाळले. तेव्हापासून ड्रॅगन चवताळला आहे. विशेष म्हणजे असे काही झाल्याच्या वृत्ताचा इन्कार चीनी परराष्ट्र मंत्रालयाने केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आताच पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय जवानांनी चीनी हद्देत प्रवेश केल्याचा कांगावा केला. त्यामुळे आता सरकार, चीनी कम्युनिस्ट पक्ष व पीएलएमधील संवादाचा अभाव जगासमोर आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पीएलएच्या निवेदनानंतर लगेचच भारताकडे राजनैतिक, सीमा संरक्षण व सार्वभौमत्त्वाचे रडगाणे गायले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मात्र आपल्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना पीएलएनेच सीमास्थिती (स्टेट्स को) बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्नावरून तणाव वाढला आहे. मात्र चीनी राजदूत सन वेईदूंग भारतीय विद्यार्थी, अभ्यासकांशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये शिकण्यासाठी तेथील सरकारने यंदाही ३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली. सीमेवरून तणाव असला तरी सॉफ्ट डिप्लोमसीसाठी दोन्ही देश अनुकूल आहेत.सीमा प्रश्नावरून चर्चेत गुंतवून पुन्हा घुसखोरी करण्याचा चीनचा कुटील डाव भारताने आधीच ओळखला होता. गेल्या आठवडाभरापासून लष्करप्रमुख, परराष्ट्र मंत्री सातत्याने चीनच्या इराद्यावर प्रश्न लावत होते. त्याचीच प्रचिती या आठवड्यात आल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.संरक्षणमंत्री राजनाथसिंह तीन दिवस रशिया दौºयावर‘शांघाय सहकार्य परिषदे’तील (एससीओ) आठ सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह बुधवारी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना झाले. मुख्य बैठक शुक्रवारी मॉस्कोमध्ये होणार आहे.भारत व चीन यांच्यात पूर्व लडाख सीमेवर तणातणी सुरू असताना ही बैठक होणार आहे. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगे व पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेज खट्टक हेही बैठकीला उपस्थित राहणार असले तरी राजनाथसिंह यांचा त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.मात्र, राजनाथसिंह रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शॉईगो यांच्याशी संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध व सहकार्य अधिक बळकट करण्यासंदर्भात चर्चा करतील. एके-४०३ रायफल्सचे भारतात उत्पादन करण्यासाठीचा करार यावेळी होईल, असे समजते. तसेच आधी झालेल्या खरेदी करारानुसार रशियाने ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा लवकर द्यावी, असाही आग्रह भारत घरेल.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन