शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: काँग्रेसमधील एकजण पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात; भाजपाच्या खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 15:45 IST

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपाला आता भाजपाचे लडाखमधील खासदार जामयांग नामग्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींसह काँग्रेस नेते देश तोडण्याची भाषा करतातराहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवालडाखचे भाजपा खासदार जामयांग नामग्याल यांचा गंभीर आरोप

लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरुन देशात काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे, २० जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या सैनिकांना नि:शस्त्र का पाठवलं? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपाला आता भाजपाचे लडाखमधील खासदार जामयांग नामग्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस शहीदांच्या बलिदानाचं सेलिब्रेशन करत आहे. राहुल गांधींसह काँग्रेस नेते देश तोडण्याची भाषा करतात. त्यामुळे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. देशाचे २० जवान शहीद झाले, १३० कोटी जनतेच्या डोळ्यात पाणी आहे. संपूर्ण देश या घटनेचा निषेध करत आहे पण काँग्रेस सेलिब्रेशन करत आहे. काँग्रेसमध्ये काहीतरी चाललं आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच राहुल गांधी खिल्ली उडवतात, प्रत्येक गोष्टीचे पुरावे मागतात, त्यांचे कार्यकर्तेही कमी नाहीत, देशाच्या जवानांच्या बलिदानाचं सेलिब्रेशन करतात, त्यांच्यासोबत जे बोलतात त्याचे कोणासोबत लिंक आहेत? गलवान चीनला घेऊ द्या असं काँग्रेस म्हणतं. कारगिलला पाकिस्तान घेऊन जाऊ द्या. ते काय षडयंत्र करत आहेत का? त्यांच्या पक्षाता काय सुरु आहे? काँग्रेसमधील कोणीतरी पाकिस्तान आणि चीनच्या संपर्कात आहे असा गंभीर आरोप लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी केला.

दरम्यान, देश तोडण्याचं षडयंत्र काँग्रेस करत आहे. राहुल गांधीविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांना अटक का केली जात नाही. चीनने भलेही भारतापासून तिबेट हडपलं. पण भारताची एक एक इंच जमीन त्यांना परत करावी लागेल. तसेच अक्साई चीन माझ्या मतदारसंघाचा भाग आहे लवकरच मी या भागाचा दौरा करणार आहे असंही भाजपा खासदार जामयांना नामग्याल यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?

आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नियोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndiaभारतchinaचीन