शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
6
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
7
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
8
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
9
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
10
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
11
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
12
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
13
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
14
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
15
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
16
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
17
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
18
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
19
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
20
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

India China FaceOff: "आँखे निकालकर हात में देना"; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चीनविरोधात एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:50 IST

भारताला शांतता हवी याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा स्वभाव मुळात विश्वासघातकी आहे.

नवी दिल्ली – चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित आहेत, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत आहोत अशी ग्वाही दिली.

या बैठकीला उद्धव ठाकरे म्हणाले की, भारताला शांतता हवी याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा स्वभाव मुळात विश्वासघातकी आहे. भारत मजबूत आहे मजबूर नाही. केंद्र सरकार चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यास सक्षम आहे. ‘आँखे निकालकर हात मे देना’ या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चीनबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीला शरद पवार यांनीही भाष्य करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी

तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला, केंद्र सरकारने ही बैठक सर्वात आधी बोलवायला हवी होती, चीन आपल्या हद्दीत किती घुसलं आहे याची माहिती सरकारने द्यावी. तसेच चीनच्या या कारवाईबाबत देशाला काहीच माहिती मिळत नाही, हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे असं म्हणता येणार नाही असं सांगितले.

तर या सर्वपक्षीय बैठकीतून देशात सकारात्मक आणि मजबूत संदेश जाईल. हा संदेश संपूर्ण देश सैन्यातील जवानांच्यासोबत एकत्रपणे उभा आहे. चीनमध्ये लोकशाही नाही, भारतात लोकशाही आहे. चीन जे वाटेल ते करु शकतो कारण त्याठिकाणी हुकुमशाही आहे. आपल्या देशात लोकशाही असून याठिकाणी सर्वजण मिळून मिसळून काम करतात असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगत भारताने चीनला टेलिकॉम, रेल्वे, एविएशन क्षेत्रात घुसण्यापासून रोखायला हवं अशी मागणीही केली.

 

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे