शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

'जुना मित्र' येणार भारताच्या कामी; चिनी दबाव झुगारून भारताला 'ब्रह्मास्त्र' देण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:05 IST

भारताला एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर देण्याचं रशियाचं आश्वासन

ठळक मुद्देजगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकरच मिळणारभारताच्या आवाहनाला रशियाकडून सकारात्मक प्रतिसादचीनसोबतचे संबंध ताणले गेले असताना भारताची ताकद वाढणार

मॉस्‍को: दीड महिन्यांपासून लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला वाद, त्यानंतर गेल्याच आठवड्यात गलवानमध्ये झालेली झटापट यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. भारत आणि चीननं सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या कोणत्याही आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे आता गोळीबार करण्याचे आदेश फिल्ड कमांडरकडून दिले जातील. सीमेवरील शस्त्रास्त्रं सज्जता वाढवण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारताला रशियानं मोठा दिलासा दिला आहे.लडाख सीमेवरील तणाव वाढत असताना रशियानं भारताला एस-४०० लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं आहे. एस-४०० जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. रशियानं भारताला शस्त्रास्त्रं पुरवठा करू नये, असं आवाहन चिनी सरकारच्या पीपल्स डेली वृत्तपत्रानं केलं होतं. मात्र चीननं निर्माण केलेला दबाव रशियानं झुगारला आहे.भारतासोबत केलेले करार लवकरात लवकर पूर्ण केले जातील, असं आश्वासन रशियाकडून देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली. 'रशियाच्या उपपंतप्रधानांसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. कोरोना संकट काळातही रशिया आणि भारतामधील दृढ संबंध कायम आहेत. आधी करण्यात आलेले करार कायम राहतील. याशिवाय काही नव्या गोष्टीही कमीत कमी कालावधीत पूर्ण केल्या जातील,' असं सिंह म्हणाले.भारत सरकारनं एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा लवकर देण्याचा आग्रह केला होता. त्याला रशिया सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला, असं वृत्त रशियन वृत्तपत्र स्पुटनिकनं दिलं आहे. जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या एस-४०० साठी भारतानं रशियासोबत २०१८ मध्ये करार केला. हा करार ४० हजार कोटी रुपयांचा आहे. भारताला एस-४०० यंत्रणेच्या चार युनिट्स मिळतील. याशिवाय भारत रशियाकडून ३१ लढाऊ विमानंदेखील खरेदी करणार आहे. टी-९० रनगाड्यांच्या सुट्ट्या भागांसाठी रशिया आणि भारतात चर्चा सुरू आहे.चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीतीभारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया