शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'जुना मित्र' येणार भारताच्या कामी; चिनी दबाव झुगारून भारताला 'ब्रह्मास्त्र' देण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:05 IST

भारताला एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर देण्याचं रशियाचं आश्वासन

ठळक मुद्देजगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकरच मिळणारभारताच्या आवाहनाला रशियाकडून सकारात्मक प्रतिसादचीनसोबतचे संबंध ताणले गेले असताना भारताची ताकद वाढणार

मॉस्‍को: दीड महिन्यांपासून लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेला वाद, त्यानंतर गेल्याच आठवड्यात गलवानमध्ये झालेली झटापट यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. भारत आणि चीननं सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या कोणत्याही आगळिकीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे आता गोळीबार करण्याचे आदेश फिल्ड कमांडरकडून दिले जातील. सीमेवरील शस्त्रास्त्रं सज्जता वाढवण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारताला रशियानं मोठा दिलासा दिला आहे.लडाख सीमेवरील तणाव वाढत असताना रशियानं भारताला एस-४०० लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं आहे. एस-४०० जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. रशियानं भारताला शस्त्रास्त्रं पुरवठा करू नये, असं आवाहन चिनी सरकारच्या पीपल्स डेली वृत्तपत्रानं केलं होतं. मात्र चीननं निर्माण केलेला दबाव रशियानं झुगारला आहे.भारतासोबत केलेले करार लवकरात लवकर पूर्ण केले जातील, असं आश्वासन रशियाकडून देण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली. 'रशियाच्या उपपंतप्रधानांसोबतची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. कोरोना संकट काळातही रशिया आणि भारतामधील दृढ संबंध कायम आहेत. आधी करण्यात आलेले करार कायम राहतील. याशिवाय काही नव्या गोष्टीही कमीत कमी कालावधीत पूर्ण केल्या जातील,' असं सिंह म्हणाले.भारत सरकारनं एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा लवकर देण्याचा आग्रह केला होता. त्याला रशिया सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला, असं वृत्त रशियन वृत्तपत्र स्पुटनिकनं दिलं आहे. जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा असलेल्या एस-४०० साठी भारतानं रशियासोबत २०१८ मध्ये करार केला. हा करार ४० हजार कोटी रुपयांचा आहे. भारताला एस-४०० यंत्रणेच्या चार युनिट्स मिळतील. याशिवाय भारत रशियाकडून ३१ लढाऊ विमानंदेखील खरेदी करणार आहे. टी-९० रनगाड्यांच्या सुट्ट्या भागांसाठी रशिया आणि भारतात चर्चा सुरू आहे.चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीतीभारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचाली

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया