शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 12:12 IST

हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्‍याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला.

ठळक मुद्दे१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झालीचीनसोबतच्या संघर्षात भारताचे २० सैनिक शहीद झाले तर बरेच चिनी सैनिकही मारले गेले रशियाच्या सांगण्यावरून चीनने जवान सोडण्यास सहमती दर्शविली.

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमेवरील तणाव जैसे थे आहे, १५ जूननंतर चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रशियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रशिया उघडपणे समोर आला नसला तरी त्यांच्या प्रयत्नाने चीनने १० भारतीय जवानांना सोडलं अन्यथा संघर्ष आणखी वाढला असता अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे २० सैनिक शहीद झाले, तर चीनमधील बरेच सैनिकही मारले गेले, ज्यांच्याबाबत चीनने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. या संपूर्ण घटनेत चीनने १० भारतीय सैनिक पकडले होते. भारतातही काही चिनी सैनिक होते. मग रशियाच्या सांगण्यावरून चीनने जवान सोडण्यास सहमती दर्शविली.

वास्तविक, २३ जून रोजी रशियाने एक बैठक घेतली. त्यात रशिया-भारत-चीन (आरआयसी) परराष्ट्र मंत्री सहभागी होणार होते. पण १५ जूननंतर भारताने स्पष्टपणे सांगितले होते की, अशा परिस्थितीत चीनशी चर्चा करणे शक्य होणार नाही. यावर रशियाने चीनशी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी चीनने भारतीय सैनिकांना सोडावे. तिन्ही देशांमधील आरआयसी रुळावर उतरू नये, अशी रशियाची इच्छा होती.

आरआयसीनंतर रशियाने निवेदनात म्हटले आहे की, हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्‍याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला. आरआयसी करण्यामागील हेतू हा होता की भारत आणि चीनमधील संबंध सुस्थितीत रहावेत, जेणेकरून आधीपासून अस्तित्त्वात असलेले करार योग्य प्रकारे पाळले जातील.

चीनच्या सीमेवरची परिस्थिती सामान्य करण्यासाठी गेल्या महिन्यापासून भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे बांधकाम करत आहेत त्यामुळे ड्रगन भडकला आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमुळे दोन्ही देशातील संघर्ष वाढला. चीनने विश्वासघाताने केलेल्या हल्ल्यात भारतीय कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासह २० भारतीय सैनिक ठार झाले. अनेक चिनी सैनिकही मारले गेले, परंतु चीनने ही माहिती दिली नाही.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश

कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी

रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल

हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र

भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशियाindia china faceoffभारत-चीन तणाव