शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 10:05 IST

लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे.

नवी दिल्लीः लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमध्ये चीनला कशा पद्धतीनं धडा शिकवायचा यावर जवळपास एकमत झालेलं आहे. सीमेवरील वाद सोडविण्यासाठी चीनशी बोलणी सुरू ठेवली पाहिजे, असाही एक मतप्रवाह आहे. पण गरज पडल्यास भारतानं ड्रॅगनशी 'संघर्ष किंवा लढाई'साठी पूर्णपणे तयार असले पाहिजे, असंही काही जणांचं म्हणणं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात मोदी सरकारच्या सर्वोच्च धोरणकर्त्यांमधील चर्चेसाठी 'संघर्ष आणि लढाई' हा शब्द वापरला गेला आहे. या चर्चेत सामील असलेल्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, “आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, पण चीनपुढे गुडघे टेकून आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.”आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही त्यांना सामोरे जाऊ, लष्करी कारवाईनंतर भारत सरकारने यावर विचार केला आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, "जर आपल्याला या परिणामाची काळजी असेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, असा सरकारचा विचार आहे. 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या प्रतिक्रियेनंतर ड्रॅगनचा सीमेवरचा तणाव कमी करेल, असे वाटतं नाही. चीन जास्तच आक्रमक झाल्यानं आम्हीसुद्धा दुसऱ्या रणनीतीवर विचार करत आहोत. चीनच्या सैन्यानं आमच्या जवानांची हत्या केली. चीननं त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्याची अपेक्षा करत नसलो तरी आमच्या सैन्याला ते जबाबदार धरत आहेत. त्यावरूनच बीजिंगचे मनसुबे स्पष्ट होतात. चीनसुद्धा सैन्य मागे घेतो, असं सांगत आहे, पण त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. लडाखच्या सीमेवरील संघर्षाला भारताची चूक आणि सैन्य जमवाजमव जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एप्रिलमध्ये चीनच्या सैन्य जमावाजमवीची पहिली बातमी उघडकीस आली, तेव्हा पेट्रोलिंग व पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर चिनी सैन्यांची संख्या सातत्याने वाढविण्यावरही त्याच प्रमाणात सैन्य केंद्रीकरण वाढवण्याचे निर्देश भारताला देण्यात आले. १९ जून रोजी सर्व पक्षांच्या बैठकीत ही माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात चीनविरूद्ध लोक संतप्त चीनशी असलेले आर्थिक संबंध संपवण्याच्या प्रश्नावर दुसर्‍या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, चीनसोबतचे व्यापार संबंध लगेचच तोडणे शक्य नाही. पण भारताचा विकास हा चीनच्या संबंधांवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. चीनविरोधात देशात प्रचंड संताप आहे. देशाचे आर्थिक हितसंबंधही लक्षात ठेवले पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी दबाव वाढवण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं. दुसर्‍या अधिका-याने सांगितले की, 'आज कोणीही युद्ध जिंकत नाही आणि सन २०२०चा भारत १९६२चा राहिलेला नाही. भारतानं प्रचंड जागतिक आघाडी घेतली आहे आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल. आपल्या ताकदीद्वारे चीनला संपूर्ण प्रदेशात भीती निर्माण करायची आहे आणि स्वत: ला एक महाशक्ती म्हणून प्रस्थापित करायचे आहे. पण त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे चीनने समजून घ्यायला हवे. 

हेही वाचा

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

टॅग्स :chinaचीनIndiaभारत