शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

India China FaceOff: भारतीय रेल्वेचा चीनच्या कंपनीला मोठा झटका; ‘इतक्या’ कोटींचे कंत्राट केलं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:21 IST

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे.

ठळक मुद्देलडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये झटापट देशाचे २० जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात संताप भारतीय रेल्वेने चीन कंपनीला दिलेले कंत्राट केले रद्द

नवी दिल्ली – लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकातील संघर्षाचा मोठा फटका चीनला सहन करावा लागणार आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा एका मोठा प्रकल्प चीनी कंपनीच्या हातातून निसटला आहे. भारतीयरेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चीनची कंपनी नॅशनल रेल्वे रिसर्च अँन्ड डिझाईन इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल अँन्ड कम्युनिकेशनसोबतचा करार रद्द केला आहे.

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे. डीएफसीसीआयएलने २०१६ मध्ये प्रोजेक्ट कानपूर रेल्वे स्टेशन पासून दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनचं काम एका चीनी कंपनीला दिलं होतं. हा प्रकल्प ४७१ कोटींचा होता. पण ४ वर्षात कंपनीने फक्त २० टक्केच काम केले, कंपनीच्या कामाची गती पाहून भारतीय रेल्वेने हे कंत्राट रद्द केले आहे.

सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे, चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला असून गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकात तुफान झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४० हून अधिक सैनिकांनाही मोठी हानी झाली. देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनबद्दल राग निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

चीनसोबतचा वाढता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींन १९ जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrailwayरेल्वे