शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

India China FaceOff: भारतीय रेल्वेचा चीनच्या कंपनीला मोठा झटका; ‘इतक्या’ कोटींचे कंत्राट केलं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:21 IST

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे.

ठळक मुद्देलडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये झटापट देशाचे २० जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात संताप भारतीय रेल्वेने चीन कंपनीला दिलेले कंत्राट केले रद्द

नवी दिल्ली – लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकातील संघर्षाचा मोठा फटका चीनला सहन करावा लागणार आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा एका मोठा प्रकल्प चीनी कंपनीच्या हातातून निसटला आहे. भारतीयरेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चीनची कंपनी नॅशनल रेल्वे रिसर्च अँन्ड डिझाईन इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल अँन्ड कम्युनिकेशनसोबतचा करार रद्द केला आहे.

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे. डीएफसीसीआयएलने २०१६ मध्ये प्रोजेक्ट कानपूर रेल्वे स्टेशन पासून दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनचं काम एका चीनी कंपनीला दिलं होतं. हा प्रकल्प ४७१ कोटींचा होता. पण ४ वर्षात कंपनीने फक्त २० टक्केच काम केले, कंपनीच्या कामाची गती पाहून भारतीय रेल्वेने हे कंत्राट रद्द केले आहे.

सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे, चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला असून गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकात तुफान झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४० हून अधिक सैनिकांनाही मोठी हानी झाली. देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनबद्दल राग निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

चीनसोबतचा वाढता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींन १९ जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrailwayरेल्वे