शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारतीय रेल्वेचा चीनच्या कंपनीला मोठा झटका; ‘इतक्या’ कोटींचे कंत्राट केलं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:21 IST

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे.

ठळक मुद्देलडाख सीमेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये झटापट देशाचे २० जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात संताप भारतीय रेल्वेने चीन कंपनीला दिलेले कंत्राट केले रद्द

नवी दिल्ली – लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैनिकातील संघर्षाचा मोठा फटका चीनला सहन करावा लागणार आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा एका मोठा प्रकल्प चीनी कंपनीच्या हातातून निसटला आहे. भारतीयरेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चीनची कंपनी नॅशनल रेल्वे रिसर्च अँन्ड डिझाईन इंस्टीट्यूट ऑफ सिग्नल अँन्ड कम्युनिकेशनसोबतचा करार रद्द केला आहे.

डीएफसीसीआयएलने याबाबत घोषणा करताना चीनी कंपनीच्या खराब कामगिरीचा हवाला दिला आहे. डीएफसीसीआयएलने २०१६ मध्ये प्रोजेक्ट कानपूर रेल्वे स्टेशन पासून दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनचं काम एका चीनी कंपनीला दिलं होतं. हा प्रकल्प ४७१ कोटींचा होता. पण ४ वर्षात कंपनीने फक्त २० टक्केच काम केले, कंपनीच्या कामाची गती पाहून भारतीय रेल्वेने हे कंत्राट रद्द केले आहे.

सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे, चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला असून गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकात तुफान झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४० हून अधिक सैनिकांनाही मोठी हानी झाली. देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनबद्दल राग निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

चीनसोबतचा वाढता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींन १९ जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrailwayरेल्वे