शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:02 IST

काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

ठळक मुद्देचीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत.चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहेपोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या चीनी आणि भारतीय सैनिकांच्या संघर्षानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, या घटनेनंतर भारत आणि चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय सैनिकांना लोखंडाच्या रॉडने, दगडाने हल्ला करण्यात आला. एलएसीवर झालेल्या या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर ७० हून अधिक जवान जखमी झालेत.

या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहे. त्यासोबत चीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

या ऑडिओ क्लीपची पुष्टी अद्याप कोणीही केली नाही पण ही व्हायरल क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीने ही बातमी दिली आहे. ऑडिओ क्लीपमध्ये चायनाचे ब्लॅक कमांडो सैनिक या प्रदेशात आले आहेत, भारतीय जवानांना त्यांनी मारहाण करुन पाठवलं आहे. सरकार २० जवान शहीद झाले आहेत असं सांगतात पण अंदाजे २००-२५० जवान शहीद झाले आहेत, चीनचे जवान मृत्यू झाले नसून काही जखमी आहेत, भारत काही करणार नाही, चीन लेहचा अर्धा भाग ताब्यात घेईल असं या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं राष्ट्राला सांगितले असून देशाची एकता, अखंडता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत शांतता प्रस्थापित करु इच्छितो पण जर कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर देण्यास सक्षम आहे असा इशारा चीनला दिला आहे.

 काय घडलं होतं?

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndiaभारतchinaचीन