शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

India China FaceOff: भारताचे २००-२५० जवान शहीद झाल्याचा दावा; काँग्रेस नेत्याची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:02 IST

काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

ठळक मुद्देचीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत.चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहेपोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या चीनी आणि भारतीय सैनिकांच्या संघर्षानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, या घटनेनंतर भारत आणि चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय सैनिकांना लोखंडाच्या रॉडने, दगडाने हल्ला करण्यात आला. एलएसीवर झालेल्या या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर ७० हून अधिक जवान जखमी झालेत.

या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहे. त्यासोबत चीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.

या ऑडिओ क्लीपची पुष्टी अद्याप कोणीही केली नाही पण ही व्हायरल क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीने ही बातमी दिली आहे. ऑडिओ क्लीपमध्ये चायनाचे ब्लॅक कमांडो सैनिक या प्रदेशात आले आहेत, भारतीय जवानांना त्यांनी मारहाण करुन पाठवलं आहे. सरकार २० जवान शहीद झाले आहेत असं सांगतात पण अंदाजे २००-२५० जवान शहीद झाले आहेत, चीनचे जवान मृत्यू झाले नसून काही जखमी आहेत, भारत काही करणार नाही, चीन लेहचा अर्धा भाग ताब्यात घेईल असं या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं राष्ट्राला सांगितले असून देशाची एकता, अखंडता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत शांतता प्रस्थापित करु इच्छितो पण जर कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर देण्यास सक्षम आहे असा इशारा चीनला दिला आहे.

 काय घडलं होतं?

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसIndiaभारतchinaचीन