शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:14 IST

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र, चीनला दोन अधिकाऱ्यांसह 40 सैनिकांना गमवावे लागले. चीनचे भारताला जबर धक्का देण्याचे कृत्य त्यांच्यावरच उलटल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेरांनी केला आहे. 

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. सीमाभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यासाठीही वेग आला आहे. कारण युद्धकाळात सामग्री वेगाने पोहोचविणे गरजेचे असणार आहे. चीनच्या बाजुचा भाग हा पठारी आहे तर भारतीय बाजुचा भाग हा हिमालयाच्या पर्वतरांगा असल्याने डोंगराळ आहे. 

गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर चीनने काटेरी लाठ्या, दगड घेऊन हल्ला केला होता. सायंकाळी 4 वाजता सुरु झालेला हा हल्ला रात्रभर सुरु होता. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच सावध होत चीनचा हा हल्ला परतवून लावताना त्यांचे ४० सैनिक मारले होते. यावर चीनने भारतानेच पहिला हल्ला केल्याचे आरोप लावणे सुरु केले आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनची पोलखोल केली आहे. चीन लष्कराच्या जनरल रँकच्या अधिकाऱ्यानेच गलवानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तिथे हिंसक घटना घडली, असा दावा केला आहे. 

चीनचे वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ झोंग्की यांनी भारतावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. झाओ हे भारतद्वेष्टे समजले जातात. त्यांनी या आधीही भारताविरोधात अनेकदा कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर चीन दुबळा पडता नये. याच विचारातून भारतावर हल्ला करण्याची चाल खेळली गेली. मात्र, त्यांना वाटत होते तसे घडलेच नाही. उलट चीनच्या लष्कराचेच मोठे नुकसान झाले आहे. चीनने गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविली आहेत. जेव्हा भारतीय जवान चर्चा करण्यासाठी तेथे गेले तेव्हा चीनचे सैनिक दबा धरून बसलेले होते. यानंतर त्यांनी हल्ला केला. यावेळी जेव्हा भारताचे दुसरे जवान मदतीसाठी धावले तेव्हा हिंसक झटापट झाली, असा दावा अमेरिकेने केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली

...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा

शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाखAmericaअमेरिका