शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:14 IST

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र, चीनला दोन अधिकाऱ्यांसह 40 सैनिकांना गमवावे लागले. चीनचे भारताला जबर धक्का देण्याचे कृत्य त्यांच्यावरच उलटल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेरांनी केला आहे. 

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. सीमाभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यासाठीही वेग आला आहे. कारण युद्धकाळात सामग्री वेगाने पोहोचविणे गरजेचे असणार आहे. चीनच्या बाजुचा भाग हा पठारी आहे तर भारतीय बाजुचा भाग हा हिमालयाच्या पर्वतरांगा असल्याने डोंगराळ आहे. 

गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर चीनने काटेरी लाठ्या, दगड घेऊन हल्ला केला होता. सायंकाळी 4 वाजता सुरु झालेला हा हल्ला रात्रभर सुरु होता. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच सावध होत चीनचा हा हल्ला परतवून लावताना त्यांचे ४० सैनिक मारले होते. यावर चीनने भारतानेच पहिला हल्ला केल्याचे आरोप लावणे सुरु केले आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनची पोलखोल केली आहे. चीन लष्कराच्या जनरल रँकच्या अधिकाऱ्यानेच गलवानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तिथे हिंसक घटना घडली, असा दावा केला आहे. 

चीनचे वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ झोंग्की यांनी भारतावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. झाओ हे भारतद्वेष्टे समजले जातात. त्यांनी या आधीही भारताविरोधात अनेकदा कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर चीन दुबळा पडता नये. याच विचारातून भारतावर हल्ला करण्याची चाल खेळली गेली. मात्र, त्यांना वाटत होते तसे घडलेच नाही. उलट चीनच्या लष्कराचेच मोठे नुकसान झाले आहे. चीनने गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमविली आहेत. जेव्हा भारतीय जवान चर्चा करण्यासाठी तेथे गेले तेव्हा चीनचे सैनिक दबा धरून बसलेले होते. यानंतर त्यांनी हल्ला केला. यावेळी जेव्हा भारताचे दुसरे जवान मदतीसाठी धावले तेव्हा हिंसक झटापट झाली, असा दावा अमेरिकेने केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली

...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा

शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाखAmericaअमेरिका