शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

India China FaceOff: सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा पंतप्रधान मोदींवर प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 22:14 IST

आपल्या गुप्तचर खात्याला एलएसीजवळ सुरु असलेल्या या कारवायांची माहिती नव्हती का? गुप्तचर यंत्रणेने चीनच्या घुसखोरीची माहिती दिली का?

नवी दिल्ली – भारतचीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. ५ मे रोजी लडाखसह काही भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्याचं समोर आलं. त्यानंतर तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती. राष्ट्राची एकता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकसाथ आहे, सरकारद्वारे घेतलेल्या निर्णयाला समर्थन असेल असं सोनिया गांधी यांनी सांगितले.

यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, भारत आणि चीन यांच्या संघर्षातील महत्त्वाच्या बाबींवर आम्ही अंधारात आहोत, लडाखमध्ये चीनी सैन्याने कधी घुसखोरी केली? चीनचे सैन्य घुसले आहे हे सरकारला कधी माहिती पडले? माहितीनुसार ५ मे रोजी ही घुसखोरी झाली? हे खरं आहे का की घुसखोरी त्यानंतर झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमेची सॅटेलाइट इमेज मिळते का? आपल्या गुप्तचर खात्याला एलएसीजवळ सुरु असलेल्या या कारवायांची माहिती नव्हती का? गुप्तचर यंत्रणेने चीनच्या घुसखोरीची माहिती दिली का? सेनेच्या अधिकाऱ्यांनी एलएसीवर चीनचा कब्जा आणि भारतीय हद्दीत चीनी सैन्याची उपस्थिती याबाबत सरकारला अलर्ट केले नाही का? सरकारच्या गुप्तचर विभागाचं हे अपयश आहे का? या सर्व प्रश्नांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यायला हवी असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.

 

दरम्यान, सरकारने एप्रिलपासून आतापर्यंत सर्व माहिती आणि सध्याची परिस्थिती सांगावी, आता यापुढे काय मार्ग आहे? चीनी सैन्याच्या परत जाण्यासाठी काय हालचाली सुरु आहेत? सरकारने हे स्पष्ट करायला हवे. चीन पहिल्याप्रमाणे जुन्या सीमेवर आपलं सैनिक परत बोलावून घेईल का? परिस्थिती पुर्वपदावर येईल का? याबाबत सरकारने आश्वासन द्यायला हवं असं सोनिया गांधी म्हणाल्या.

काय म्हणाले शरद पवार?

. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे.आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून सीमेवर तणाव वाढला; भारत-चीन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

"आँखे निकालकर हात में देना"; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चीनविरोधात एल्गार

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी

नेपाळनंतर आता बांगलादेशही भारताच्या विरोधात?; चीनची सर्वात मोठी रणनीती

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी