शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले तर गोळी चालवायला मागे-पुढे पाहणार नाही, भारताचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 25, 2020 22:12 IST

लवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत.

नवी दिल्ली -लडाखमध्ये LACवर तणावाचे वातावरण आहे. अशातच, ''चिनी सैनिक आमच्या पोस्टवर आले, तर आमचे जवान सेल्फ डिफेन्स (स्व-संरक्षणासाठी) गोळी चालवतील,'' असा इशारा भारतानेचीनला दिला असल्याचे सरकारी सूत्रांकडून समजते. 

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत-चीन संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर चीनने भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट्सवर मोठ्या प्रमाणावर आपले सैनिक तैनात केले आहेत. यानंतर भारताने पुन्हा असे झाले तर परिणाम भोगायला तयार रहा, असा इशाराही ड्रॅगनला दिला आहे. गलवानमधील घटनेनंतर, चीनच्या शांततेच्या आवाहनावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे स्पष्ट झाले आहे. 

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

असा आहे भारताचा प्रस्ताव - लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन तणाव वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. यातच भारताने चीनला एक प्रस्ताव दिला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माल्‍दो येथे झालेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत भारताने म्हटले आहे, चीनने सर्व ठिकाणांनवरून मागे सरकायला हवे. भारताच्या मते देपसांगमधील मैदानांपासून ते पेंगाँगच्या दक्षिणेकडील भागापर्यंत सर्व ठिकाणांवरून चीनने मागे सरकायला हवे. ही प्रक्रिया निवड केल्याप्रमाणे व्हायला नको. मात्र, चिनी सैनिकांनी सर्वप्रथम एलएसीवरून मागे सरकावे, हा प्रस्ताव चीनला अमान्य आहे. त्यांचे म्हणणे आहे, की भारतीय जवानांनी सर्वप्रथम दक्षिण पेगाँग त्‍सो भागातून मागे सरकायला हवे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

गलवान झटापटीनंतर भारत-चीन तणाव वाढला -जवळपास 40 वर्षांत पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये गलवानमध्ये झटापट झाली. चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सांगितले आहे. गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात आणखी वाढ झाली. 29 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर चिनी सैनिकांनी पेगाँग सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचे केलेले प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले होते. आधी चीनने पुढे सरकण्यास व सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यानंतर भारतही सरसावला आहे.

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

चीनी लष्कराची मोठी हानी -गलवान खोऱ्यातील झटापटीत 20 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तर काही जवान जखमी झाले होते. या घटनेत चीनी लष्कराची मोठी हानी झाली होती, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला होता. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शीजिन यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण आपल्या ट्विटला जोडून ‘गलवानमधील संघर्षात भारतापेक्षा चीनचे कमी नुकसान झाले आहे, तसेच एकाही चिनी सैनिकाला भारताने ताब्यात घेतलेले नाही. उलट अनेक भारतीय सैनिकांना चिनी लष्कराने पकडले होते. चीनचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले, ही खोटी बातमी आहे’ असे म्हटले होते. 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतladakhलडाख