शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

India China Face Off: चीन नरमला, तणाव निवळला; सैन्य माघारीवरून दोघांत सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 05:57 IST

प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर हाणामारी होऊन तणावास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावर भारतचीन यांच्यात सहमती झाली. चीनने नरमाई दाखवल्याने दोन्ही देशांमधील तणाव निवळला. ६ जूनला अशीच सहमती झाली होती. पण नंतर प्रत्यक्ष सैन्य मागे घेण्यावरून गलवान खोऱ्यात हाणामारी होऊन एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचेही ४३ सैनिक ठार वा जखमी झाले होते.गलवान खो-यातील पॅट्रोलिंग पॉइंट १४ व १५, गोगराच्या पॅट्रोलिंग पॉइंट १७ ए , हॉटस्प्रिंग, फिंगर ४ तसेच पॅनगाँग त्सो सरोवर ही वादाची प्रमुख ठिकाणे आहेत. येथून दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे ठरले तरी त्याला काही दिवस लागतील. त्याचा तपशील ठरविण्यासाठी बैठका होतील आणि माघारीचे काम टप्प्याटप्प्याने होईल.>‘जैसे थे’ स्थितीसाठी भारताचा आग्रहसीमेवर ६ जूनच्या आधीची ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा भारताने बैठकीत आग्रह धरला. तसेच सैन्य केवळ माघारी न घेता गेल्या काही आठवड्यांत सैन्य तुकड्या व अवजड युद्धसामुग्रीची सीमेजवळ केलेली जमवाजवही पूर्वीच्या पातळीवर आणण्यावर भारताने भर दिला. आधीच्या बैठकीत झालेल्या सहमतीचे चिनी सैन्याकडून उल्लंघन झाल्यानेच गलवान खोºयातील दुर्दैवी घटना घडली, हेही भारताने चीनला ठासून सांगितले.>११ तास चालली बैठकसोमवारी रात्री दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ११ तासांच्या बैठकीत सहमती झाली. भारताकडून यात लेफ्ट. जनरल हरिंदर सिंह या बैठकीत व चीनकडून मेजर जनरल लिऊ लिन चर्चेत सहभागी होते.>लष्करप्रमुख नरवणे लडाख सीमेवरलष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख भेटीसाठी मंगळवारी दुपारी लेह येथे पोहोचले. तिथे लष्करी तुकड्यांच्या कमांडरांसोबत चर्चा करून, ते प्रत्यक्ष सीमेवर स्थितीचा आढावा घेतील. सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर लष्करप्रमुखांनी सीमेवर जाण्याची ही दुसरी वेळ असेल. लेहला येण्यापूर्वी लष्करप्रमुखांनी सर्व लष्करी कमांडरांची बैठक घेऊन सीमेवरील स्थिती व सैन्यसज्जता याचा आढावा घेतला होता. गेल्या आठवड्यात हवाईदल प्रमुख आर. के. एस. भादुरिया यांनीही सीमेलगतच्या लेह व श्रीनगर हवाईतळांना भेट दिली होती. त्यानंतर हवाईदलाची अनेक लढाऊ विमाने सीमेवर तैनात करण्यात आली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारत