शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

India China Face Off: खंजीर खुपसला! चीनचा मागे हटण्याचा दिखावा; भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 07:56 IST

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता.

लडाख : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. मात्र, सोमवारी चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. युद्धात सारे काही माफ असते म्हणतात. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. मात्र, चीनने मागे हटण्याचा शब्द मोडला आणि नव्या दमाचे सैनिक घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी परतला. 

चीनी मिडीया सीमापार युद्धाभ्यासाचे फोटो शेअर करत होता. या फोटोंद्वारे चीन जो इशारा देत होता, तोच त्याने प्रत्यक्षात आणला. भारतीय हद्दीतून मागे हटण्याची तयारी चीनने दर्शविली होती. तसा दिखावा केला आणि अचानक हल्ला केला. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीमध्ये कसे भारतीय जवान शहीद झाले. 

भारताकडून कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू चीनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होते. ते झटापटीच्या एक तास आधीपर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. सोमवारी सकाळी त्यांनी चीनशी चर्चा केली. त्य़ावेळी चीनने भारतीय सीमेतून मागे हटण्याचे मान्य केले.यानंतर संतोष बाबू ५० जवानांसह स्टँड ऑफ पॉईंटची माहिती घेण्यासाठी गेले. चीनच्या सैन्याने दिलेल्या आश्वासनानुसार सैन्य माघारी परतले की पुन्हा चीनने काही दगाबाजी केली हे पाहण्यासाठी ते गेले होते. भारतीय सैन्य एलएसीवरील चीनी सैन्याने बनविलेले बेकायदेशीर घरे तोडत होती. याचवेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने परत येऊन ठेपले. भारताचे 50 आणि चीनचे 250 सैनिक एकमेकांसमोर आले. भारतीय जवानांनी त्यांना भारतीय सीमेत जाण्यापासून रोखले. तेव्हा चीनच्या सैनिकांनी त्यांच्यावर काटेदार दांड्यांनी हल्ला केला. 

दोन्ही सैनिकांमध्ये ही झटापट गलवान नदीमध्येच होत होती. नदीचा प्रवाह वेगवान होता. यामुळेच मोठ्या प्रमाणावर सैनिकांचे जीव गेले. कारण जखमी झाल्यानंतर दोन्ही बाजुचे सैनिक पाण्याच्या प्रवाहात पडत होते. PP14 वर पोहोचण्यासाठी भारतीय जवानांना 5 ठिकाणी गलवान नदी पार करावी लागते. आधी कर्नल संतोषसह तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर भारतीय सैन्याने झीरो तापमानामध्ये असलेले सर्व जखमी सैनिक शहीद झाल्याचे सांगितले. या झटापटीत चीनचे 43 सैनिकही ठार झाले आहेत.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख