नवी दिल्ली: पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पिनपॉईंट स्ट्राईक केल्याच्या वृत्तावर भारतीय सैन्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार झाला नसल्याचं भारतीय सैन्यानं म्हटलं आहे. 'एएनआय'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असल्यानं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं स्ट्राईक केल्याची चर्चा होती. त्यावर भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरण
By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 7:13 PM