शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 08:26 IST

India Canada Relations Update: कॅनडामध्ये झालेल्या जी-७ देशांच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शेवटी या बैठकीसाठी कॅनडाकडून अखेरच्या क्षणी निमंत्रण मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहिले. तसेच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्येही औपचारिक भेट झाली.

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये झालेल्या जी-७ देशांच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. शेवटी या बैठकीसाठी कॅनडाकडून अखेरच्या क्षणी निमंत्रण मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहिले. तसेच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्येही औपचारिक भेट झाली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेदरम्यान उभय देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार भारत आणि कॅनडा एकमेकांड्या देशांसाठी उच्चायुक्तांची नियुक्ती करतील. दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यवसायांसाठी नियमित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर एकमत झालं आहे. गेल्या काही काळात दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे.

नरेंद्र मोदी आणि माईक कार्नी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी परस्पर सन्मान, कायद्याचं राज्य आणि सार्वभौमत्व यावर आधारित संबंधांना दृढ करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली.

तसेच दोन्ही देशांमध्ये नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीवर झालेलं एकमत ही या भेटीमधील सर्वात मोठी घोषणा ठरली.  खलिस्तानच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि इतर विवादांमुळे मागच्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. तसेच दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्तांना माघारी बोलावले होते. मात्र आता उच्चायुक्तांच्या नव्याने नियुक्तीचा निर्णय झाल्याने त्याचा लाभ दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यावसायिकांना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही बैठक सराकात्मक आणि रचनात्मक असल्याचे म्हटले आहे.

याबरोबर दोन्ही देशांनी लवकरच व्यापाराबाबत चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांनी पुढच्या काळात पुन्हा एकदा भेटण्याचे निश्चित केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा दौऱ्याची सांगता करताना  जी-७ बैठकीमध्ये जागतिक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालल्याचे सांगितले. तसेच या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी कॅनडाच्या सरकार आणि जनतेचे आभार मानले.  

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदी