शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

भारतने कॅनाडाच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा; फक्त 'या' लोकांना मिळणार परवानगी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:01 PM

India-Canada Issue: खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले आहेत.

India-Canada Row: भारत आणि कॅनडामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडलेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली व्हिसा सेवा बुधवारी (25 ऑक्टोबर) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाच्या ओटावामधील भारतीय उच्चायुक्तांनी (High Commission of India) सोशल मीडियावर सांगितले की, व्हिसा सेवा केवळ प्रवेश व्हिसा, व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा या श्रेणींमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. उच्चायुक्तांनी निवेदनात पुढे म्हटले की, सुरक्षा कारणास्तव यापूर्वी व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा व्हिसा सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून (26 ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

कॅनडाने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावलेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच सांगितले होते की, भारतात कॅनडाच्या डिप्लोमॅट्सची संख्या जास्त आहे, त्यामुळे समतोल निर्माण करण्याची गरज आहे. हे लोक भारताच्या अंतर्गत बाबींमध्येही ढवळाढवळ करतात. त्यामुळे कॅनडाने आपले अधिकारी परत बोलवावे, आम्ही लवकरच त्यांना दिलेली सूट मागे घेणार आहोत. यानंतर कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलावावे लागले. 

वाद कसा सुरू झाला?कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरची जुन महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येचा आरोप भारतावर लावला. भारतीय गुप्तचर संस्थांनी हत्या केल्याचे वक्तव्य ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केले. याला उत्तर देताना भारताने ट्रूडोचे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतरच हा वाद सुरू झाला.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाVisaव्हिसाInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर